शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

‘डिजिटलायजेशन’मुळे खटल्यांचा वेगाने निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:47 IST

डिजिटलायजेशन’मुळे न्यायालयाचा वेळ आणि शासनाच्या पैशाची बचत होऊन पक्षकारांना जलद न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकिलांच्या कार्यालयातील नवीन तंत्रज्ञान केंद्राबद्दल गिरासे माहिती देत होते. देशातील उच्च न्यायालयांमध्ये औरंगाबाद खंडपीठातील तंत्रज्ञान केंद्र पहिले आयटी सेंटर आणि अन्य उच्च न्यायालयांसाठी ‘पथदर्शी’ ठरले असल्याचे ते म्हणाले.

ठळक मुद्देमुख्य सरकारी वकील अमरसिंह गिरासे यांच्याशी संवाद

प्रभुदास पाटोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटलायजेशन’मुळे न्यायालयाचा वेळ आणि शासनाच्या पैशाची बचत होऊन पक्षकारांना जलद न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकिलांच्या कार्यालयातील नवीन तंत्रज्ञान केंद्राबद्दल गिरासे माहिती देत होते. देशातील उच्च न्यायालयांमध्ये औरंगाबाद खंडपीठातील तंत्रज्ञान केंद्र पहिले आयटी सेंटर आणि अन्य उच्च न्यायालयांसाठी ‘पथदर्शी’ ठरले असल्याचे ते म्हणाले.खंडपीठाची उपयुक्तता१९८२ साली मुंबई उच्च न्यायालयातून केवळ ७०० याचिका हस्तांतरित होऊन औरंगाबादला सुरू झालेल्या खंडपीठात सध्या ३९,००० याचिका दाखल होत आहेत. यावरून औरंगाबाद खंडपीठाची उपयोगिता आता पटते, अशी प्रतिक्रया ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. हाच धागा पकडून गिरासे म्हणाले की, पूर्वी मराठवाड्याच्या अगदी टोकाच्या छोट्याशा गावातील पक्षकाराला न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाणे अशक्य होते. मुंबईला जाणे, तेथे राहण्याची व्यवस्था करणे, वकिलांची फी आदी बाबी अशक्य होत्या. त्यामुळे सामान्य माणूस एका अर्थाने न्यायापासून वंचित होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेमुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या १२ जिल्ह्यांतील पक्षकारांना ‘घर अंगणी’ न्याय मिळत असल्यामुळे खंडपीठ स्थापण्यामागचा उद्देश सफल होत असल्याचे दिसते.प्रलंबित याचिकांचा निपटाराप्रलंबित याचिका निकाली काढण्याबद्दलची माहिती देताना गिरासे म्हणाले की, औरंगाबाद खंडपीठातील सर्वच न्यायमूर्ती यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. खंडपीठात येण्यापूर्वी कित्येक तास ते हजारो पानांच्या याचिकांचे वाचन करून दिवसभरात पाच तास न्यायदान करतात. न्यायालयीन वेळेनंतर सायंकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत लघुलेखकांना ‘डिक्टेशन’ देतात. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरापर्यंत याचिकांचे वाचन करून दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीची तयारी करतात. खंडपीठात दररोज सुमारे १,५०० प्रकरणे सुनावणीसाठी लागतात. इतकेच नव्हे, तर उन्हाळ्याच्या सुटीत केवळ ‘सुटीतील न्यायमूर्तीच’ नव्हे, तर जवळपास सर्वच न्यायमूर्ती सुटीचा उपभोग न घेता याचिकांवर नियमित सुनावणी घेतात. परिणामी, १९८९ पासूनची प्रलंबित फौजदारी अपिले आणि १९९४ पासूनची जामिनावरील सुनावणीची प्रकरणे जवळपास निकाली निघाली आहेत.तीनच तारखांमध्ये निकालराज्यात ३३ लाख २२ हजार आणि औरंगाबाद खंडपीठात एक लाख ७३ हजार याचिका प्रलंबित आहेत. त्यातील बहुतांश याचिकांमध्ये राज्य शासन प्रतिवादी असते. अशा प्रकरणांच्या अंतिम सुनावणीआधी साधारणपणे ८ ते १० तारखा पडतात. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ तीनच तारखांमध्ये याचिकेवरील निकाल अपेक्षित आहे. खंडपीठात शासनाविरुद्धच्या याचिका स्वीकारण्यासाठी खास यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. तेथे याचिका स्वीकारताच पक्षकाराला त्याची पोच दिली जाते. लगेचच याचिकेचे ‘स्कॅनिंग’ होऊन त्याची माहिती मंत्रालयातील संबंधित विभागापासून तलाठी कार्यालयापर्यंतच्या सरकारी कार्यालयांना ‘ई-मेल’द्वारे दिली जाते. त्यांच्याकडून ‘ई-मेल’द्वारेच याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल केले जाते. अधिकाºयांना प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. यामुळे सरकारी यंत्रणेचे काम सुकर होऊन न्यायदान गतिमान होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.शिक्षेचा दर ७३.२ टक्केएका प्रश्नाला उत्तर देताना गिरासे म्हणाले की, आरोपींना शिक्षा होण्याचा पूर्वीचा दर १.५ टक्का होता. मागील तीन-चार वर्षांत तो ७३.२ टक्के झाला आहे. अर्थातच याचे श्रेय न्यायमूर्तींनाच जाते. मात्र, त्यासाठी तपास यंत्रणा (पोलीस) आणि सरकारी वकीलही मदतरूप ठरतात. शिक्षेचा दर आणखी वाढावा यासाठी खंडपीठातील पाच-सहा सरकारी वकिलांचा गट तयार करून त्यांना ‘विशिष्ट’ प्रकारची प्रकरणेच चालविण्यास देण्याचा नवीन प्रयोग करीत आहोत. यामुळे संबंधित सरकारी वकील तशी प्रकरणे हाताळण्यास सक्षम होतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थापनेला १५० वर्षे झाली असून, नागपूर खंडपीठाच्या स्थापनेला ८६ वर्षे झाली आहेत, तर औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेला केवळ ३५ वर्षे झाली आहेत. त्यांच्या तुलनेत औरंगाबाद खंडपीठातील वकील संघ ‘तरुण’ (यंग बार) आहे. येथील वकील अभ्यासू आणि कष्टाळू आहेत. त्यांना खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञांचे नेहमीच सहकार्य लाभते.विधि विद्यापीठ कार्यरतऔरंगाबादेतील राष्टÑीय विधि विद्यापीठाच्या स्थापनेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला होता. मात्र, या विद्यापीठात शिकविण्यासाठी ‘फॅकल्टी’ आणि ज्येष्ठ न्यायमूर्ती उपलब्ध होत नसल्यामुळे तो निर्णय त्यांच्या कार्यकाळात अमलात येऊ शकला नाही. त्यांच्यानंतरचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांनी त्या निर्णयाची घोषणा केली. मागील वर्षापासून हे विद्यापीठ औरंगाबादला सुरू झाले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादadvocateवकिल