शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी

By विजय सरवदे | Updated: June 23, 2023 16:48 IST

जिल्हा परिषदेने कसली कंबर, आतापर्यंत २०८३ नमुने प्रयोगशाळेकडे

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ५७५९ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २०८३ पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळल्यास साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळीच त्यावर उपाययोजना करता येतील, या हेतूने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी सर्व ‘बीडीओं’ना सूचना दिल्या आहेत. ७ जूनपासून जिल्ह्यातील ही मोहीम सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ८७० जलसुरक्षकांमार्फत पाण्याची रासायनिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला २० जूनपर्यंत ही मोहीम राबविण्याचे निर्देश होते. आता ३० जूनपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.

तथापि, आतापर्यंत गावातील पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे २०८३ पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात आले असून हे नमुने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर जमा करण्यात आले. तेथे पाणी गुणवत्ता पोर्टलवर नोंद करून हे नमुने जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, पाचोड आणि सिल्लोड उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात आले आहेत. पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व विस्तार अधिकारी आरोग्य हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नजिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५७५९ स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करून त्याच्या नोंदी केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ही मोहीम युद्धपातळीवर सुरू असून ३० जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याद्वारे पाण्यातील पीएच, टर्बिडीटी, लोह, क्लोराईड, मॅग्नेशियम फ्लोराईड आदीचे प्रमाण समजून येईल. त्यानंतर सदरील दूषित स्रोतांसाठी शुद्धीकरण मोहीम हाती घेणे सोपे जाईल. ज्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.- राजेंद्र देसले, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादRainपाऊस