शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी

By विजय सरवदे | Updated: June 23, 2023 16:48 IST

जिल्हा परिषदेने कसली कंबर, आतापर्यंत २०८३ नमुने प्रयोगशाळेकडे

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ५७५९ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २०८३ पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळल्यास साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळीच त्यावर उपाययोजना करता येतील, या हेतूने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी सर्व ‘बीडीओं’ना सूचना दिल्या आहेत. ७ जूनपासून जिल्ह्यातील ही मोहीम सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ८७० जलसुरक्षकांमार्फत पाण्याची रासायनिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला २० जूनपर्यंत ही मोहीम राबविण्याचे निर्देश होते. आता ३० जूनपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.

तथापि, आतापर्यंत गावातील पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे २०८३ पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात आले असून हे नमुने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर जमा करण्यात आले. तेथे पाणी गुणवत्ता पोर्टलवर नोंद करून हे नमुने जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, पाचोड आणि सिल्लोड उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात आले आहेत. पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व विस्तार अधिकारी आरोग्य हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नजिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५७५९ स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करून त्याच्या नोंदी केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ही मोहीम युद्धपातळीवर सुरू असून ३० जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याद्वारे पाण्यातील पीएच, टर्बिडीटी, लोह, क्लोराईड, मॅग्नेशियम फ्लोराईड आदीचे प्रमाण समजून येईल. त्यानंतर सदरील दूषित स्रोतांसाठी शुद्धीकरण मोहीम हाती घेणे सोपे जाईल. ज्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.- राजेंद्र देसले, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादRainपाऊस