शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून ५७५९ स्रोतांची रासायनिक तपासणी

By विजय सरवदे | Updated: June 23, 2023 16:48 IST

जिल्हा परिषदेने कसली कंबर, आतापर्यंत २०८३ नमुने प्रयोगशाळेकडे

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ५७५९ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २०८३ पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळल्यास साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळीच त्यावर उपाययोजना करता येतील, या हेतूने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी सर्व ‘बीडीओं’ना सूचना दिल्या आहेत. ७ जूनपासून जिल्ह्यातील ही मोहीम सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ८७० जलसुरक्षकांमार्फत पाण्याची रासायनिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला २० जूनपर्यंत ही मोहीम राबविण्याचे निर्देश होते. आता ३० जूनपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.

तथापि, आतापर्यंत गावातील पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे २०८३ पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात आले असून हे नमुने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर जमा करण्यात आले. तेथे पाणी गुणवत्ता पोर्टलवर नोंद करून हे नमुने जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, पाचोड आणि सिल्लोड उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात आले आहेत. पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व विस्तार अधिकारी आरोग्य हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नजिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५७५९ स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करून त्याच्या नोंदी केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ही मोहीम युद्धपातळीवर सुरू असून ३० जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याद्वारे पाण्यातील पीएच, टर्बिडीटी, लोह, क्लोराईड, मॅग्नेशियम फ्लोराईड आदीचे प्रमाण समजून येईल. त्यानंतर सदरील दूषित स्रोतांसाठी शुद्धीकरण मोहीम हाती घेणे सोपे जाईल. ज्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.- राजेंद्र देसले, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादRainपाऊस