शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आमठाणा येथे २८०० रुपये क्विंटल दराने मिरची खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:04 AM

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. उन्हाळ्याच्या प्रतिकूल ...

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. उन्हाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीत मिरची जगवली. मात्र, तिला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

परिसरातील आमठाणा, घाटनांद्रा, धावडा, केळगाव, कन्नड तालुक्यातील चिंचोली, करंजखेडा या भागात एप्रिल महिन्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता ही मिरची निघायला सुरुवात आहे. सिल्लोड तालुक्यातील नावाजलेली मिरचीची बाजारपेठ म्हणून आमठाणा परिचित आहे. येथे स्थानिक व्यापाऱ्यांसह दिल्ली, मुंबई, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथूनही व्यापारी मिरची खरेदीसाठी येतात. मात्र, यंदा कोरोना स्थितीमुळे सदर व्यापारी येण्याची शक्यता धूसर आहे. मिरची आवक सुरु झाल्यामुळे स्थानिक व्यापारी राजू सुसर, गजानन देशमुख, बी. के. मोरे, सचिन चौधरी या मिरची व्यापाऱ्यांनी काटा सुरू केला आहे. सुरुवातीलाच मिरचीला प्रतिक्विंटल २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गतवर्षी सुरुवातीलाच सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

कोट

कोरोनाच्या परिस्थितीमुळे परराज्यातील व्यापारी मिरची खरेदीला येत नसल्याने मिरचीचे दर कमी आहेत. येणाऱ्या काळात परिस्थिती सर्वसामान्य झाली, तर भाव वाढतील.

बाळासाहेब ईवरे, मिरची व्यापारी, आमठाणा

कोट

गतवर्षी चांगला दर मिळाल्याने शेतकरी खूश होते. यंदा मिरचीवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव असून, शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यात भाव चांगला मिळाला नाही, तर नाराजी होते.

जी. पी. सुरडकर, कृषी सहाय्यक, केळगाव

फोटो : आमठाणा येथील मिरची बाजार सुरू झाला असून, काट्याचे पूजन करताना मान्यवर.

180621\img-20210618-wa0218_1.jpg

आमठाणा येथील मिरची बाजार सुरु झाला असून काट्याचे पूजन करताना मान्यवर.