शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

By संतोष हिरेमठ | Updated: August 6, 2024 18:28 IST

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती?

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन परिसरातील झाडांवरील बगळ्यांचे गणगोत पुन्हा उसवत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामाच्या जागेतील झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांना गायब करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच उडूही न शकणारी बगळ्यांची पिलं जमिनीवर ‘सैरभैर’ अवस्थेत पहायला मिळत आहेत. जणू ‘आम्हाला कोणी वाचविणार का’ अशी सादच ही पिलं घालीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करण्यात येत आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होत असल्याची स्थिती आहे. काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. ही झाडे तोडण्यासाठी त्यावरील घरटी, पक्षी इतरत्र हलविण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून काही घरटी, पिलं खाली पडली आहे. ही पिलं रेल्वेस्टेशन परिसरात भयभीत होत फिरत असल्याची स्थिती आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काय घडले होते २०१५ मध्ये?ऑगस्ट २०१५ मध्ये रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडत असल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यावरून पक्ष्यांची घरटी असलेली झाडे तोडण्यात आली. त्यातून झाडांवरील घरटी खाली पडली आणि अनेक बगळ्यांचा जीव गेला.

आम्ही स्थलांतरित करतोय हो?रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांची परिस्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधी, छायाचित्रकार टिपत होते. त्यावरील इमारतीच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही बगळ्याची घरटी, पक्षी स्थलांतरित करीत आहोत’, असे सांगितले. मात्र, कुठे स्थलांतरित केले जात आहे, हे सांगितले नाही.

घरटी, बगळे वाचावेझाडांवर घरटी असेल ते झाड तोडता येत नाही. पक्ष्यांची घरटी इतरत्र स्थलांतर करता येत नाही. घरटी स्थलांतरांचा प्रयत्न कुणी केला तरी पक्ष्यांच्या जीवासाठी ते योग्य होत नाही. सध्या पक्ष्यांचा विणीचा काळ आहे. अशा काळात झाडे तोडता कामा नये. घरटी असेल तर झाडे वाचविलेच पाहिजे. रेल्वेस्टेशनवर २०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.- किशोर पाठक, मानद वन्य जीव रक्षक

वन विभागाशी संपर्क, ‘एनजीओ’च्या मदतीने स्थलांतरपार्सल कार्यालयाच्या ठिकाणी दोन झाडांमध्ये एग्रेट पक्षी राहतात. या पक्ष्यांना स्थलांतरित करण्यासाठी आम्ही वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ‘एनजीओ’ची माहिती प्रदान केली. आम्ही त्या ‘एनजीओ’च्या मदतीने गत आठवड्यात अनेक पक्षी आणि अंडी इतर झाडावर यशस्वीरीत्या स्थलांतरित केली.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), ‘दमरे’

परवानगी दिलेली नाहीरेल्वेस्टेशनवरील झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. पक्ष्यांची घरटी नष्ट केल्यानंतर ही परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेस्टेशनवरील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनenvironmentपर्यावरण