शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

By संतोष हिरेमठ | Updated: August 6, 2024 18:28 IST

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती?

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन परिसरातील झाडांवरील बगळ्यांचे गणगोत पुन्हा उसवत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामाच्या जागेतील झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांना गायब करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच उडूही न शकणारी बगळ्यांची पिलं जमिनीवर ‘सैरभैर’ अवस्थेत पहायला मिळत आहेत. जणू ‘आम्हाला कोणी वाचविणार का’ अशी सादच ही पिलं घालीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करण्यात येत आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होत असल्याची स्थिती आहे. काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. ही झाडे तोडण्यासाठी त्यावरील घरटी, पक्षी इतरत्र हलविण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून काही घरटी, पिलं खाली पडली आहे. ही पिलं रेल्वेस्टेशन परिसरात भयभीत होत फिरत असल्याची स्थिती आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काय घडले होते २०१५ मध्ये?ऑगस्ट २०१५ मध्ये रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडत असल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यावरून पक्ष्यांची घरटी असलेली झाडे तोडण्यात आली. त्यातून झाडांवरील घरटी खाली पडली आणि अनेक बगळ्यांचा जीव गेला.

आम्ही स्थलांतरित करतोय हो?रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांची परिस्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधी, छायाचित्रकार टिपत होते. त्यावरील इमारतीच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही बगळ्याची घरटी, पक्षी स्थलांतरित करीत आहोत’, असे सांगितले. मात्र, कुठे स्थलांतरित केले जात आहे, हे सांगितले नाही.

घरटी, बगळे वाचावेझाडांवर घरटी असेल ते झाड तोडता येत नाही. पक्ष्यांची घरटी इतरत्र स्थलांतर करता येत नाही. घरटी स्थलांतरांचा प्रयत्न कुणी केला तरी पक्ष्यांच्या जीवासाठी ते योग्य होत नाही. सध्या पक्ष्यांचा विणीचा काळ आहे. अशा काळात झाडे तोडता कामा नये. घरटी असेल तर झाडे वाचविलेच पाहिजे. रेल्वेस्टेशनवर २०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.- किशोर पाठक, मानद वन्य जीव रक्षक

वन विभागाशी संपर्क, ‘एनजीओ’च्या मदतीने स्थलांतरपार्सल कार्यालयाच्या ठिकाणी दोन झाडांमध्ये एग्रेट पक्षी राहतात. या पक्ष्यांना स्थलांतरित करण्यासाठी आम्ही वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ‘एनजीओ’ची माहिती प्रदान केली. आम्ही त्या ‘एनजीओ’च्या मदतीने गत आठवड्यात अनेक पक्षी आणि अंडी इतर झाडावर यशस्वीरीत्या स्थलांतरित केली.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), ‘दमरे’

परवानगी दिलेली नाहीरेल्वेस्टेशनवरील झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. पक्ष्यांची घरटी नष्ट केल्यानंतर ही परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेस्टेशनवरील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनenvironmentपर्यावरण