शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

By संतोष हिरेमठ | Updated: August 6, 2024 18:28 IST

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती?

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन परिसरातील झाडांवरील बगळ्यांचे गणगोत पुन्हा उसवत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामाच्या जागेतील झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांना गायब करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच उडूही न शकणारी बगळ्यांची पिलं जमिनीवर ‘सैरभैर’ अवस्थेत पहायला मिळत आहेत. जणू ‘आम्हाला कोणी वाचविणार का’ अशी सादच ही पिलं घालीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करण्यात येत आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होत असल्याची स्थिती आहे. काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. ही झाडे तोडण्यासाठी त्यावरील घरटी, पक्षी इतरत्र हलविण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून काही घरटी, पिलं खाली पडली आहे. ही पिलं रेल्वेस्टेशन परिसरात भयभीत होत फिरत असल्याची स्थिती आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काय घडले होते २०१५ मध्ये?ऑगस्ट २०१५ मध्ये रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडत असल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यावरून पक्ष्यांची घरटी असलेली झाडे तोडण्यात आली. त्यातून झाडांवरील घरटी खाली पडली आणि अनेक बगळ्यांचा जीव गेला.

आम्ही स्थलांतरित करतोय हो?रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांची परिस्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधी, छायाचित्रकार टिपत होते. त्यावरील इमारतीच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही बगळ्याची घरटी, पक्षी स्थलांतरित करीत आहोत’, असे सांगितले. मात्र, कुठे स्थलांतरित केले जात आहे, हे सांगितले नाही.

घरटी, बगळे वाचावेझाडांवर घरटी असेल ते झाड तोडता येत नाही. पक्ष्यांची घरटी इतरत्र स्थलांतर करता येत नाही. घरटी स्थलांतरांचा प्रयत्न कुणी केला तरी पक्ष्यांच्या जीवासाठी ते योग्य होत नाही. सध्या पक्ष्यांचा विणीचा काळ आहे. अशा काळात झाडे तोडता कामा नये. घरटी असेल तर झाडे वाचविलेच पाहिजे. रेल्वेस्टेशनवर २०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.- किशोर पाठक, मानद वन्य जीव रक्षक

वन विभागाशी संपर्क, ‘एनजीओ’च्या मदतीने स्थलांतरपार्सल कार्यालयाच्या ठिकाणी दोन झाडांमध्ये एग्रेट पक्षी राहतात. या पक्ष्यांना स्थलांतरित करण्यासाठी आम्ही वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ‘एनजीओ’ची माहिती प्रदान केली. आम्ही त्या ‘एनजीओ’च्या मदतीने गत आठवड्यात अनेक पक्षी आणि अंडी इतर झाडावर यशस्वीरीत्या स्थलांतरित केली.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), ‘दमरे’

परवानगी दिलेली नाहीरेल्वेस्टेशनवरील झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. पक्ष्यांची घरटी नष्ट केल्यानंतर ही परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेस्टेशनवरील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनenvironmentपर्यावरण