शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील नागरी सुविधांच्या अभावाबाबत जनहित याचिका; मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:56 IST

या जनहित याचिकेवर आठ आठवड्यानंतर (उन्हाळ्याच्या सुटीनंतर) पुढील सुनावणी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पुरेशा नागरी सुविधांअभावी जालना शहरातील नागरिकांच्या जीवितास आणि आरोग्यास धोका निर्माण झाल्याबाबत दाखल ‘जनहित याचिकेच्या’ अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी राज्य शासन, जालना मनपाचे आयुक्त व जिल्हाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या जनहित याचिकेवर आठ आठवड्यानंतर (उन्हाळ्याच्या सुटीनंतर) पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिका ?बाबूराव नागोजीराव सतकर यांनी ॲड. बलभीम केदार यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेद्वारे जालना शहरवासीयांचे जीवित आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने पुरेशा नागरी सुविधा पुरवाव्यात, अशी मुख्य विनंती केली आहे.

२०२३ साली तत्कालीन नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले आहे. मात्र, मनपा नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवीत नाही. पाण्याच्या टाकीवर झाकण नाही. शहरात घाणीचे ढीग आहेत. ड्रेनेजचीही दुरवस्था आहे. शहरातच कत्तलखाने असल्यामुळे कापलेल्या जनावरांचे अवशेष तेथेच टाकले जातात. परिणामी, ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्री तेथे जमतात. ही कुत्री जवळून जाणाऱ्यांच्या मागे धावतात व त्यांना चावा घेतात. रस्त्यांवर खड्डे आणि अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्यांच्या मधोमध विद्युत खांब आहेत. त्या खांबांबाबत सावधानतेचा इशारा देणारे फलक, परावर्तक किंवा दिवा नाही. परिणामी ‘ते’ खांब अपघातांना कारणीभूत ठरत आहेत, आदी नागरी असुविधांचा उल्लेख याचिकेत केला आहे.

‘त्या’ तिघांच्या मृत्यूस मनपा आयुक्तांना जबाबदार धरा२३ सप्टेंबर २०२४ रोजी रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबावर धडकून पोलिस कर्मचारी जितेंद्र बोडखे यांचा मृत्यू झाला होता. तसेच १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झाकण नसलेल्या नूतन वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत सुमारे पाच-सहा दिवसांपूर्वीचा सडलेल्या अवस्थेतील अनिल काकडे यांचा मृतदेह आढळला होता, तर ४ डिसेंबर २०२४ रोजी छोटेखान बशीरखान हे शहरातील कत्तलखान्याजवळून दुचाकीवर जात असताना जनावरांचे अवशेष खात असलेली कुत्री मागे लागल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकावर धडकून छोटेखानचा मृत्यू झाला होता, असा उल्लेख करून कापल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर/ दुर्लक्ष केल्यामुळे या तिघांच्याही मृत्यूस मनपा आयुक्तांना जबाबदार धरावे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका