शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जालन्यातील नागरी सुविधांच्या अभावाबाबत जनहित याचिका; मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:56 IST

या जनहित याचिकेवर आठ आठवड्यानंतर (उन्हाळ्याच्या सुटीनंतर) पुढील सुनावणी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पुरेशा नागरी सुविधांअभावी जालना शहरातील नागरिकांच्या जीवितास आणि आरोग्यास धोका निर्माण झाल्याबाबत दाखल ‘जनहित याचिकेच्या’ अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी राज्य शासन, जालना मनपाचे आयुक्त व जिल्हाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या जनहित याचिकेवर आठ आठवड्यानंतर (उन्हाळ्याच्या सुटीनंतर) पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे याचिका ?बाबूराव नागोजीराव सतकर यांनी ॲड. बलभीम केदार यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेद्वारे जालना शहरवासीयांचे जीवित आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने पुरेशा नागरी सुविधा पुरवाव्यात, अशी मुख्य विनंती केली आहे.

२०२३ साली तत्कालीन नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले आहे. मात्र, मनपा नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवीत नाही. पाण्याच्या टाकीवर झाकण नाही. शहरात घाणीचे ढीग आहेत. ड्रेनेजचीही दुरवस्था आहे. शहरातच कत्तलखाने असल्यामुळे कापलेल्या जनावरांचे अवशेष तेथेच टाकले जातात. परिणामी, ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्री तेथे जमतात. ही कुत्री जवळून जाणाऱ्यांच्या मागे धावतात व त्यांना चावा घेतात. रस्त्यांवर खड्डे आणि अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्यांच्या मधोमध विद्युत खांब आहेत. त्या खांबांबाबत सावधानतेचा इशारा देणारे फलक, परावर्तक किंवा दिवा नाही. परिणामी ‘ते’ खांब अपघातांना कारणीभूत ठरत आहेत, आदी नागरी असुविधांचा उल्लेख याचिकेत केला आहे.

‘त्या’ तिघांच्या मृत्यूस मनपा आयुक्तांना जबाबदार धरा२३ सप्टेंबर २०२४ रोजी रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबावर धडकून पोलिस कर्मचारी जितेंद्र बोडखे यांचा मृत्यू झाला होता. तसेच १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झाकण नसलेल्या नूतन वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत सुमारे पाच-सहा दिवसांपूर्वीचा सडलेल्या अवस्थेतील अनिल काकडे यांचा मृतदेह आढळला होता, तर ४ डिसेंबर २०२४ रोजी छोटेखान बशीरखान हे शहरातील कत्तलखान्याजवळून दुचाकीवर जात असताना जनावरांचे अवशेष खात असलेली कुत्री मागे लागल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकावर धडकून छोटेखानचा मृत्यू झाला होता, असा उल्लेख करून कापल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर/ दुर्लक्ष केल्यामुळे या तिघांच्याही मृत्यूस मनपा आयुक्तांना जबाबदार धरावे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका