शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचार करता येणार नाहीत; जुलैपासून नवीन कायदा लागू होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 18:46 IST

देशात जुलैपासून नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा (मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट) लागू केला जाणार आहे. या कायद्यामुळे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचारच करता येणार नाही.

ठळक मुद्देदेशात १५ कोटी नागरिक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. जुलैपासून नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा (मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट) लागू केला जाणार आहे

औरंगाबाद : देशात जुलैपासून नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा (मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट) लागू केला जाणार आहे. या कायद्यामुळे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचारच करता येणार नाही. नातेवाईकांपेक्षा जो व्यक्ती आजारी आहे, ज्याची विचार क्षमताच नाही, त्याची मंजुरी घेऊन त्याच्या इच्छेनुसार उपचार करावे लागतील. नातेवाईकांच्या हक्कावर गदा आणून एकप्रकारे हा कायदा मनोरुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणारा आहे, असे इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मृगेश वैष्णव म्हणाले. 

औरंगाबाद सायकॅट्रिक सोसायटीतर्फे रविवारी (दि.२०)  मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ विषयी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. वैष्णव बोलत होते.  चर्चासत्रात डॉ. सुरेश बदामठ, डॉ. अश्विन मोहन, डॉ. ओ. पी. सिंग, डॉ. निमेश देसाई, डॉ. राजेश धुमे आणि डॉ. मृगेश वैष्णव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, सचिव डॉ. विक्रांत पाटणकर, कोषाध्यक्ष डॉ. अमर राठी, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. गजानन कुलकर्णी, डॉ. मोनाली देशपांडे, डॉ. आशिष मोहिदे आदी उपस्थित होते.

डॉ. वैष्णव म्हणाले, नवा कायदा हा भारतीय परिस्थितीनुसार नाही. मानसिक आजारांविषयी आजही समाजात जनजागृती नाही. हा कायदा बनविताना इंडियन सायकॅट्रिक सोसायटीलादेखील विश्वासात घेण्यात आले नाही. देशात १५ कोटी नागरिक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे; परंतु कायद्यामुळे या लोकांना सामान्य प्रवाहात आणण्यापासून रोखले जात आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत मनोरुग्णाला नातेवाईक उपचारासाठी घेऊन येत असे आणि डॉक्टर उपचार करत. यापुढे जोपर्यंत मनोरुग्ण संमती देणार नाही, तोपर्यंत तज्ज्ञाला उपचारच करता येणार नाही. रु ग्णाने जर काही लिहून ठेवले असेल, तर त्याचेही पालन करावे लागेल. जुलैपासून हा कायदा लागू होईल. यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानसिक आरोग्य रिव्हू बोर्ड तयार केले जातील. प्रत्येक रुग्णालयाला या कायद्याचे पालन करावे लागेल.

नव्या कायद्यातील काही बाबीआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस दोषी मानून दंडीत केले जाणार नाही, अशा व्यक्तीस मानसिक आधार आणि वैद्यकीय मदत दिली जाईल. मानसिक आजारांचा आरोग्य विम्यात समावेश केला जाईल. या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीस मानसिक आजारावर सन्मानपूर्वक उपचार मिळविण्याचा अधिकार राहील. बेघर आणि दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तीस मोफत उपचार मिळतील.

कायद्यातील काही त्रुटीआरोग्य विम्यामध्ये कोणकोणते मनोविकार अंतर्भूत आहेत, याबद्दल स्पष्टता नाही. या कायद्यान्वये गठित होणाऱ्या शासन नियुक्त समितीवर मानसोपचारतज्ज्ञांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही. याचा परिणाम मनोरुग्णाच्या उपचार पद्धतीवर होऊ शकतो. मनोरुग्णाला उपचार पद्धत निवडण्याचा अधिकार दिला आहे. हे काही रुग्णांच्या योग्य उपचारात अडथळा ठरू शकतो,अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्यGovernmentसरकार