शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

भीमा-कोरेगाव दंगलीत मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाखाची मदत द्या;  मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:26 IST

भीमा कोरेगाव येथील -दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एका जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

औरंगाबाद : भीमा कोरेगाव येथील -दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एका जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा-कोरेगाव घटनेचा मराठा क्र ांती मोर्चाने जाहिर निषेध नोंदविला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या भीडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे हे असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही.  असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने  अमरावतीचे भाजपा आमदार अनिल बोंढे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या आमदार बोंढे यांना तातडीने अटक  करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे.  

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आम्ही ५८ मोर्चे  काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गिय समाजाला माहित आहे. शिवाय मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत. जातीयवादी प्रवृत्तीचे हे कट कारस्थान असून ते उधळून लावण्याचे आवाहन क्रांती मोर्चा करीत आहे. भीमा कोरेगाव, वढू बु., सणसवाडी आणि राज्यातील विविध  भागात जनतेच्या वाहनांचे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे  तीन दिवसात मोठे नुकसान झाले. तहसीलदारामार्फत या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना आठ दिवसात शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे लाखोच्या संख्येने समाज अभिवादनासाठी येणार असल्याचे माहित असूनही पोलीस प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त न ठेवल्याने ही घटना घडली. यामुळे या घटनेला जबाबदार गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर कारवाई करावीऔरंगाबाद शहरात दंगलसदृश्य परिस्थिती असताना शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रजेवर निघून गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी आणलेले चिली ड्रोनही पोलिसांनी वापरले नाही. पोलीस आयुक्तांच्या रजेवर जाण्यामुळे शहरातील कायदा- व सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळली. यामुळे पोलीस आयुक्तांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी समन्वयकांनी केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद