शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

भीमा-कोरेगाव दंगलीत मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाखाची मदत द्या;  मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:26 IST

भीमा कोरेगाव येथील -दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एका जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

औरंगाबाद : भीमा कोरेगाव येथील -दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एका जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा-कोरेगाव घटनेचा मराठा क्र ांती मोर्चाने जाहिर निषेध नोंदविला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या भीडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे हे असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही.  असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने  अमरावतीचे भाजपा आमदार अनिल बोंढे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या आमदार बोंढे यांना तातडीने अटक  करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे.  

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आम्ही ५८ मोर्चे  काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गिय समाजाला माहित आहे. शिवाय मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत. जातीयवादी प्रवृत्तीचे हे कट कारस्थान असून ते उधळून लावण्याचे आवाहन क्रांती मोर्चा करीत आहे. भीमा कोरेगाव, वढू बु., सणसवाडी आणि राज्यातील विविध  भागात जनतेच्या वाहनांचे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे  तीन दिवसात मोठे नुकसान झाले. तहसीलदारामार्फत या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना आठ दिवसात शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे लाखोच्या संख्येने समाज अभिवादनासाठी येणार असल्याचे माहित असूनही पोलीस प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त न ठेवल्याने ही घटना घडली. यामुळे या घटनेला जबाबदार गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर कारवाई करावीऔरंगाबाद शहरात दंगलसदृश्य परिस्थिती असताना शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रजेवर निघून गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी आणलेले चिली ड्रोनही पोलिसांनी वापरले नाही. पोलीस आयुक्तांच्या रजेवर जाण्यामुळे शहरातील कायदा- व सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळली. यामुळे पोलीस आयुक्तांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी समन्वयकांनी केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद