शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी केला रस्त्यावरच स्वयंपाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:08 IST

आंदोलकांनी वर्गणी गोळा करीत चुलीवर स्वयंपाक करून आयुक्तालय प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद :  दुष्काळ निवारण संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू केले असून, आज दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी वर्गणी गोळा करीत चुलीवर स्वयंपाक करून आयुक्तालय प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि हाताला काम देण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी समितीने आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलकांनी विभागीय प्रशासनाची भेट घेऊन गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेटण्याची वेळ घेऊन देण्याची मागणी केली. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये मुक्ताराम गव्हाणे, माधवराव निर्मळ, बाळासाहेब अलगे, सुनील शिंदे, पुरण सनान्से, समाधान सुरासे, प्रकाश वाघ, अ‍ॅड. आसाराम लहाने, यादवराव कांबळे, सुभाष वागले, जगन्नाथ काथारे, श्रीनिवास वाकनकर, उद्धव देशमुख, तसेच महिलांचा सहभाग आहे. 

फायनान्स कंपन्यांकडून दमदाटी करणारी वसुली सुरू आहे, त्याला चाप बसविण्यात यावा. दिग्रस उच्चस्तर बंधाऱ्यातून पळविण्यात आलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पातून भरपाई करा, माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी उपलब्ध करून सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील लाभक्षेत्रास पाणीपाळ्या द्या, इसाद प्रकल्पासाठी पाणी द्या, रोजगार मागणी केलेल्या सर्व मजुरांना रोहयोची किमान २०० दिवस कामे उपलब्ध करून द्या, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी, हाताला काम आणि सर्वांना रेशन यासह दुष्काळ निवारणासाठीच्या १३ सुविधा तात्काळ अमलात आणा,  ठोका, बटईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, वीज बिल माफ करा, आदी मागण्या समितीने निवेदनाद्वारे केल्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्री