शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोग रुग्णालयाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:09 IST

स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल.

ठळक मुद्देसंसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. . संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल. 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात अन्य रुग्णसेवा थांबवून केवळ कोरोनाचे उपचार करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती ओळखून प्रत्येक जिल्ह्यात आगामी काळात संसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले  आहे. 

शहरात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे ३० मार्चपासून पूर्णपणे कोरोना रुग्णालयात रुपांतरित झाले.  ही परिस्थिती अन्य शहरांतही पाहायला मिळत आहे.  त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले जात आहे.

कोरोनाची चर्चा सुरू झाली की, सध्या पुण्यातील  डॉ. नायडू रुग्णालयाचे नाव घेतले जाते. हे रुग्णालय सव्वाशे वर्षांहून अधिक काळ विविध संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे मुकाबला करीत आहे. प्लेग, देवी, कॉलरा, इन्फ्ल्युएन्झा, पोलिओ या सध्या हद्दपार झालेल्या आणि स्वाइन फ्लू , बर्ड फ्लू, सार्स, इबोला, निपाह आणि कोरोना या संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करीत हे रुग्णालय नागरिकांच्या दिमतीला उभे आहे; परंतु अन्य शहरांत अशा रुग्णालयांचा अभाव आहे. त्यामुळे  संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल. संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल. 

कोरोनाच्या नियंत्रणानंतर प्रस्ताव : प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य  रोगासाठी रुग्णालय प्रस्तावित  करण्यात येत आहे. औरंगाबादचाही त्यात समावेश असेल. कोरोनाच्या उपचारासाठी सज्ज करण्यात आलेल्या इमारती आणि जेथे खाटा, व्हेंटिलेटर, आॅक्सिजनसह अन्य यंत्रणा आहे, त्याचे रूपांतर कोरोनाच्या नियंत्रणानंतर संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात करावे, असे प्रस्तावित केले जाईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य