शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

फटाका मार्केट सुरू होण्यापूर्वीच वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:29 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, ...

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी जळाले होते मार्केट : एकाच ठिकाणी दोन संघटनांची दुकाने

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, दुकाने थाटण्यावरून दोन संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशन आणि जय महाराष्ट्र फटाका मार्केट यांच्यात अधिकृत आणि अनधिकृत या मुद्यावरून वाद पेटला आहे. नियमानुसार एकाच ठिकाणी दोन मार्केट भरविणे शक्य नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी फटाका मार्केटवरून तक्रारी सुरू केल्या आहेत.२९ आॅक्टोबर २०१६ रोजी जि.प.मैदानावरील फटाका मार्केट जळून खाक झाले होते. १४० दुकानांची परवानगी असताना तेथे १८० दुकाने थाटण्यात आली होती. तसाच प्रकार अयोध्यानगरी येथील मार्केटमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशनने ५० दुकानांची परवानगी पुणे येथील छावणी विभागाकडून घेतली आहे. पुणे येथील छावणी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ती जागा असोसिएशनला देण्यात आली आहे, तर जय महाराष्ट्र फटाका मार्केटची २५ दुकाने थाटण्यात येणार आहेत. त्यांनाही पूर्ण परवानगी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.दोन्ही मार्केट अध्यक्षांचा दावा असाउत्सव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद खामगावकर यांनी सांगितले, गट नं.१९०, १९१ मधील १ एकर जागेत फटाका मार्केट उभारण्यासाठी छावणी परिषदेने आम्हाला परवानगी दिली आहे. ५० दुकानांना पोलीस, मनपा, पीडब्ल्यूडी, छावणी परवानगी मिळाली आहे. फायर ब्रिगेडची परवानगी बाकी आहे. आमची दुकाने नियमात असून अधिकृत आहेत. एकाच गटात दोन मार्केट असू शकत नाहीत.जय महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले, २५ दुकाने उभारण्यासाठी अधिकृतरीत्या परवानगी मिळाली आहे. नियमात बसून मार्केट उभारले जाईल. छावणीने गट नं. १९१ मध्ये आम्हाला जागा दिली आहे. उत्सव असोसिएशनला गट नं. १९० मध्ये त्यांना जागा दिलेली असताना गट नं. १९२ व ९३ मध्ये त्यांनी दुकाने लावल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.परवाना नियम असा...३ मीटर अंतर दोन दुकानांमध्ये असणे आवश्यक आहे. रस्त्यापासून ९०० फुटावर दुकाने असावेत. १० बाय १० ची जागा एका दुकानाला असावी. अग्निशामक आणि पोलिसांचा परवाना मिळाल्यावरच फटाके विक्री करण्याचे दुकान थाटता येते. ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची तपासणी करूनच परवाने दिले जातात. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकामाचे दुकान नसेल तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, अशा सूचना अग्निशामक विभागातर्फे देण्यात येतात. हे सगळे नियम पाळले आहेत की नाहीत. याची पाहणी करण्याची मागणी होत आहे.त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण; मदत कागदावरचसरकार: तासाभराच्या आगीत झाले होते १० कोटींहून अधिक नुकसानऔरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात २९ आॅक्टोबर रोजी झालेल्या अग्नितांडवात फटक्यांची १४० दुकाने आगीत खाक झाली होती. तसेच ११२ वाहनेही जळाली. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे पाठविला. मंडप व वाहने मिळून १५ कोटींपर्यंतचे नुकसान झाले होेते. त्या प्रकरणात अद्याप काहीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. अग्निशामक विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या साडेदहा एकर मैदानावर १८० फटाका विके्रत्यांना परवानगी दिली होती.औरंगाबाद फटाका असोसिएशनच्या भरवशावरच फटाक्यांचा बाजार भरला होता. त्या १०.५ एकरमध्ये दुकाने किती, पार्किंगची व्यवस्था कशी असेल. पाण्याचे टँकर,अग्निशमन बंबची व्यवस्था, दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठी किती गेट असावेत. याचा कुठलाही नकाशा त्यावेळी तयार करण्यात आला नव्हता. मनपा अग्निशमन यंत्रणा, पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने जि.प.मैदानावरील फटाका बाजार ‘रामभरोसे’च भरला होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfire crackerफटाके