शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

फटाका मार्केट सुरू होण्यापूर्वीच वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:29 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, ...

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी जळाले होते मार्केट : एकाच ठिकाणी दोन संघटनांची दुकाने

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, दुकाने थाटण्यावरून दोन संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशन आणि जय महाराष्ट्र फटाका मार्केट यांच्यात अधिकृत आणि अनधिकृत या मुद्यावरून वाद पेटला आहे. नियमानुसार एकाच ठिकाणी दोन मार्केट भरविणे शक्य नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी फटाका मार्केटवरून तक्रारी सुरू केल्या आहेत.२९ आॅक्टोबर २०१६ रोजी जि.प.मैदानावरील फटाका मार्केट जळून खाक झाले होते. १४० दुकानांची परवानगी असताना तेथे १८० दुकाने थाटण्यात आली होती. तसाच प्रकार अयोध्यानगरी येथील मार्केटमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशनने ५० दुकानांची परवानगी पुणे येथील छावणी विभागाकडून घेतली आहे. पुणे येथील छावणी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ती जागा असोसिएशनला देण्यात आली आहे, तर जय महाराष्ट्र फटाका मार्केटची २५ दुकाने थाटण्यात येणार आहेत. त्यांनाही पूर्ण परवानगी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.दोन्ही मार्केट अध्यक्षांचा दावा असाउत्सव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद खामगावकर यांनी सांगितले, गट नं.१९०, १९१ मधील १ एकर जागेत फटाका मार्केट उभारण्यासाठी छावणी परिषदेने आम्हाला परवानगी दिली आहे. ५० दुकानांना पोलीस, मनपा, पीडब्ल्यूडी, छावणी परवानगी मिळाली आहे. फायर ब्रिगेडची परवानगी बाकी आहे. आमची दुकाने नियमात असून अधिकृत आहेत. एकाच गटात दोन मार्केट असू शकत नाहीत.जय महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले, २५ दुकाने उभारण्यासाठी अधिकृतरीत्या परवानगी मिळाली आहे. नियमात बसून मार्केट उभारले जाईल. छावणीने गट नं. १९१ मध्ये आम्हाला जागा दिली आहे. उत्सव असोसिएशनला गट नं. १९० मध्ये त्यांना जागा दिलेली असताना गट नं. १९२ व ९३ मध्ये त्यांनी दुकाने लावल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.परवाना नियम असा...३ मीटर अंतर दोन दुकानांमध्ये असणे आवश्यक आहे. रस्त्यापासून ९०० फुटावर दुकाने असावेत. १० बाय १० ची जागा एका दुकानाला असावी. अग्निशामक आणि पोलिसांचा परवाना मिळाल्यावरच फटाके विक्री करण्याचे दुकान थाटता येते. ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची तपासणी करूनच परवाने दिले जातात. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकामाचे दुकान नसेल तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, अशा सूचना अग्निशामक विभागातर्फे देण्यात येतात. हे सगळे नियम पाळले आहेत की नाहीत. याची पाहणी करण्याची मागणी होत आहे.त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण; मदत कागदावरचसरकार: तासाभराच्या आगीत झाले होते १० कोटींहून अधिक नुकसानऔरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात २९ आॅक्टोबर रोजी झालेल्या अग्नितांडवात फटक्यांची १४० दुकाने आगीत खाक झाली होती. तसेच ११२ वाहनेही जळाली. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे पाठविला. मंडप व वाहने मिळून १५ कोटींपर्यंतचे नुकसान झाले होेते. त्या प्रकरणात अद्याप काहीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. अग्निशामक विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या साडेदहा एकर मैदानावर १८० फटाका विके्रत्यांना परवानगी दिली होती.औरंगाबाद फटाका असोसिएशनच्या भरवशावरच फटाक्यांचा बाजार भरला होता. त्या १०.५ एकरमध्ये दुकाने किती, पार्किंगची व्यवस्था कशी असेल. पाण्याचे टँकर,अग्निशमन बंबची व्यवस्था, दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठी किती गेट असावेत. याचा कुठलाही नकाशा त्यावेळी तयार करण्यात आला नव्हता. मनपा अग्निशमन यंत्रणा, पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने जि.प.मैदानावरील फटाका बाजार ‘रामभरोसे’च भरला होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfire crackerफटाके