शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:29 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते

छत्रपती संभाजीनगर : निवडून येण्यापूर्वी खूप बाता मारल्या; पण आता निवडून आल्यानंतर महायुती सरकार दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढतेय, अशी टीका बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा, माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. पक्षाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित संताजी- धनाजी सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. यावेळी राज्य अभियानप्रमुख महेश बडे, विभागीय निरीक्षक घनश्याम पेठे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे मंचावर उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे अनिल पालोदे, बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे, जालना जिल्हाप्रमुख श्रीमंत राऊत, मोहन मुंडे, अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख विनोद परदेशी, लक्ष्मण पोकळे, मधुकर घाडगे, लक्ष्मी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असे बच्चू कडू यांनी बजावले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते पक्षाचे कार्य सक्रियपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी धनाजी सन्मान पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले, तर शिवाजी गाडे यांनी आभार मानले. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यांतील प्रहारचे कार्यकर्ते व दिव्यांग उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर