शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:29 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते

छत्रपती संभाजीनगर : निवडून येण्यापूर्वी खूप बाता मारल्या; पण आता निवडून आल्यानंतर महायुती सरकार दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढतेय, अशी टीका बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा, माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. पक्षाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित संताजी- धनाजी सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. यावेळी राज्य अभियानप्रमुख महेश बडे, विभागीय निरीक्षक घनश्याम पेठे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे मंचावर उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे अनिल पालोदे, बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे, जालना जिल्हाप्रमुख श्रीमंत राऊत, मोहन मुंडे, अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख विनोद परदेशी, लक्ष्मण पोकळे, मधुकर घाडगे, लक्ष्मी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असे बच्चू कडू यांनी बजावले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते पक्षाचे कार्य सक्रियपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी धनाजी सन्मान पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले, तर शिवाजी गाडे यांनी आभार मानले. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यांतील प्रहारचे कार्यकर्ते व दिव्यांग उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर