शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:29 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते

छत्रपती संभाजीनगर : निवडून येण्यापूर्वी खूप बाता मारल्या; पण आता निवडून आल्यानंतर महायुती सरकार दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढतेय, अशी टीका बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा, माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. पक्षाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित संताजी- धनाजी सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. यावेळी राज्य अभियानप्रमुख महेश बडे, विभागीय निरीक्षक घनश्याम पेठे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे मंचावर उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे अनिल पालोदे, बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे, दिव्यांग जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे, जालना जिल्हाप्रमुख श्रीमंत राऊत, मोहन मुंडे, अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख विनोद परदेशी, लक्ष्मण पोकळे, मधुकर घाडगे, लक्ष्मी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असे बच्चू कडू यांनी बजावले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते पक्षाचे कार्य सक्रियपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी धनाजी सन्मान पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले, तर शिवाजी गाडे यांनी आभार मानले. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यांतील प्रहारचे कार्यकर्ते व दिव्यांग उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर