शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

प्रतिबंधानंतरही खाजगी बसचा वेग कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:42 IST

खाजगी बसच्या फेऱ्यांमुळे शहरात अपघाताची भीती वाढली

ठळक मुद्दे रात्री ११ नंतरच शहरातील जालना रोडवर परवानगी

औरंगाबाद : जालना रोडवर खाजगी प्रवासी बसला सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असतानाही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सायंकाळी सात वाजताच भरधाव खाजगी बसच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. 

भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खाजगी बसवर कारवाई करीत त्यांना ठरवून दिलेल्या महावीर चौक, अदालत रोड, शहानूरमियाँ दर्गा परिसरात थांबे दिले होते. रात्री ११ नंतरच शहरातील जालना रोडवर परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील कोंडी सुटलेली होती; परंतु पुन्हा रस्त्यावर खाजगी बससेवा बिनधास्तपणे चालविली जात असून, वाहतुकीला अडसर केला जात आहे. काही बस तर दिवसादेखील जालना रोडवरून जाताना दिसतात. त्या सर्व खाजगी बस या बायपासमार्गे जाव्यात, असे आदेशित केले होते; परंतु जालना रोडवर अदालत रोड, सिडको परिसरातून ठराविक वेळेपूर्वी वाहने चालविली जातात, त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

नगरनाका ते केम्ब्रिज चौकापर्यंत वाहतूक शाखेचे कर्मचारी असतानादेखील खाजगी बस शहरात येताना दिसत आहेत. सिडको पुलाजवळ तर सिडको बसस्थानकाकडून जळगाव रोडकडे जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे; परंतु जालना रोड पुन्हा वाहतूक कोंडीला तोंड देत आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची भीती वाढली आहे. पोलीस याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसhighwayमहामार्ग