शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

घाटी रुग्णालयातून पळालेला कैदी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:09 IST

माय-लेकीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी किशोरला जानेवारी महिन्यात ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेने यशवंतनगर परिसरात घेतले आरोपीला ताब्यात

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार घेताना तुरुंग रक्षकाची नजर चुकवून हातकडी काढून ५ डिसेंबर रोजी सकाळी पसार झालेला कैदी किशोर विलास आव्हाड याला गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर शनिवारी बेड्या ठोकल्या.

माय-लेकीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी किशोरला जानेवारी महिन्यात ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तेव्हापासून तो तुरुंगात होता. ॲपेंडिक्सचा त्रास सुरू झाल्यामुळे ३ डिसेंबरच्या रात्री त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला हातकडी लावून ठेवले होते. उपचारादरम्यान त्याच्या सिटी स्कॅनचा अहवाल आणण्यासाठी तुरुंग रक्षक अन्य वॉर्डांत गेले असता कैदी किशोरने ५ डिसेंबरला घाटीतून पहाटे धूम ठोकली होती. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता.

दरम्यान, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार प्रकाश चव्हाण, संदीप सानप, प्रभाकर राऊत हे गस्तीवर असताना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तो यशवंतनगर परिसरातील रेल्वे रुळावर उभा असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. यानंतर पथकाने साध्या वेशात तेथे जाऊन शिताफीने किशोरला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद