शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

‘मुद्रकांनी संघटित व्हावे’

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून, एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करून मुद्रण व्यवसाय वाढविण्याची आणि समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे.

औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून, एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करून मुद्रण व्यवसाय वाढविण्याची आणि समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुद्रकांनी संघटित व्हावे, असा सूर रविवारी मराठवाडा मुद्रक मेळाव्यात व्यक्त झाला.औरंगाबाद मुद्रक संघातर्फे मराठवाडा मुद्रक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे कोषाध्यक्ष उदय धोटे, कर सल्लागार सुनील काला यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे मुद्रण क्षेत्रात विविध बदल होत आहेत. आज डिजिटल प्रिंटिंग आणि त्रिमिती तंत्र महत्त्वाचे ठरत आहे. येणाऱ्या काळात त्रिमिती तंत्र आणखी मोठे होणार आहे. तसेच मराठवाड्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) येत आहे. ‘डीएमआयसी’मुळे मराठवाड्याचा, विशेषत: औरंगाबादचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये मुद्रकांनाही मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत.मेळाव्यात उदय धोटे यांनी अकाऊंटिंग, व्यवस्थापन, कॉस्टिंग आणि सुनील काला यांनी ‘मुद्रण व्यवसाय व कायदे’ याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या मुद्रण स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले. औरंगाबाद मुद्रक संघाचे अध्यक्ष अजितकुमार लोहाडे, उपाध्यक्ष विश्वास पारटकर, सचिव अशोक बुलगे, कोषाध्यक्ष संजय जाधव, ‘इपामा’चे एन.एस. मंकू, जे.एस. कालसी, केशव तुपे, डी.डी. गव्हाड, हरिभाऊ नरवडे, विशाल आर्वीकर, किरण मालोदे, भिकन ओपळकर आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यातील जवळपास २५० मुद्रकांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.