शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भूस्खलन रोखण्यासाठी करा वृक्षसंवर्धन

By admin | Updated: August 2, 2014 01:10 IST

अविनाश चमकुरे, नांदेड भूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़

अविनाश चमकुरे, नांदेडभूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़ अशा स्वरुपाच्या घटना टाळण्यासाठी डोंगरावर वृक्षसंवर्धन करणे चांगला उपाय होवू शकतो, असे मत भूगर्भशास्त्राचे अभ्यासक तथा स्वारातीम विद्यापीठाचे बीसीयुडी डॉ़ दीपक पानसकर यांनी व्यक्त केले़ भूस्खलन झाल्याने माळीण हे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ येथील डोंगर बेसाल्ट या खडकापासून निर्माण झाले आहेत़ मराठवाड्यात आढळून येणारे खडक याच प्रकारातील आहेत़ सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची जास्त असून पाऊसही अधिक पडतो़ त्यामुळे असे प्रकार जास्त प्रमाणात घडतात़ तुलनेने मराठवाड्यात या उंचीचे डोंगरही नाहीत़ शिवाय पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येथे भूस्खलनाची भीती नाही़ पर्यावरण संतुलनात वृक्षांची भूमिका महत्त्वाचीझाडाची मुळे जमीन घट्ट रोवून ठेवण्याचे काम करतात़ त्यामुळे जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होणे असे प्रकार होत नव्हते़ शहरीकरणासाठी जागेची कमतरता भासत असल्याने निसर्गाच्या विरोधात जावून अनेक डोंगर पोखरुन काढले जात आहे़ मुरुमासाठीही मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे़ यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला जात आहे़ बेसुमार वृक्षतोडीने मौल्यवान वनसंपदा नामशेष होत आहे़ परिणामी पावसाच्या अनियमिततेने अवर्षणाचा सामना करावा लागत आहे़ काय कराव्यात उपाययोजना ४डोंगरपायथ्याशी अनेक गावे वसली आहेत़ अशा डोंगरांची सातत्याने पाहणी करणे गरजेचे आहे़ विशेषत: पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही खबरदारी घ्यावी़ डोंगरावर भेगा आढळल्यास व ही फट वाढत गेल्यास येथे पावसाचे पाणी मुरण्याची जास्त शक्यता असते़ पुढील धोका टळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सिमेंटींग, वायरनेट, ग्राऊटींग करुन डोंगर एकसंघ ठेवता येऊ शकतो़ पुणे जिल्ह्यातील माळीण येथे भूस्खलनाच्या घटनेत अख्खे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ त्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या राज्यभरातील गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यासाठी आता राज्य शासनानेही उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे़, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे़