शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

भूस्खलन रोखण्यासाठी करा वृक्षसंवर्धन

By admin | Updated: August 2, 2014 01:10 IST

अविनाश चमकुरे, नांदेड भूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़

अविनाश चमकुरे, नांदेडभूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़ अशा स्वरुपाच्या घटना टाळण्यासाठी डोंगरावर वृक्षसंवर्धन करणे चांगला उपाय होवू शकतो, असे मत भूगर्भशास्त्राचे अभ्यासक तथा स्वारातीम विद्यापीठाचे बीसीयुडी डॉ़ दीपक पानसकर यांनी व्यक्त केले़ भूस्खलन झाल्याने माळीण हे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ येथील डोंगर बेसाल्ट या खडकापासून निर्माण झाले आहेत़ मराठवाड्यात आढळून येणारे खडक याच प्रकारातील आहेत़ सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची जास्त असून पाऊसही अधिक पडतो़ त्यामुळे असे प्रकार जास्त प्रमाणात घडतात़ तुलनेने मराठवाड्यात या उंचीचे डोंगरही नाहीत़ शिवाय पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येथे भूस्खलनाची भीती नाही़ पर्यावरण संतुलनात वृक्षांची भूमिका महत्त्वाचीझाडाची मुळे जमीन घट्ट रोवून ठेवण्याचे काम करतात़ त्यामुळे जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होणे असे प्रकार होत नव्हते़ शहरीकरणासाठी जागेची कमतरता भासत असल्याने निसर्गाच्या विरोधात जावून अनेक डोंगर पोखरुन काढले जात आहे़ मुरुमासाठीही मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे़ यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला जात आहे़ बेसुमार वृक्षतोडीने मौल्यवान वनसंपदा नामशेष होत आहे़ परिणामी पावसाच्या अनियमिततेने अवर्षणाचा सामना करावा लागत आहे़ काय कराव्यात उपाययोजना ४डोंगरपायथ्याशी अनेक गावे वसली आहेत़ अशा डोंगरांची सातत्याने पाहणी करणे गरजेचे आहे़ विशेषत: पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही खबरदारी घ्यावी़ डोंगरावर भेगा आढळल्यास व ही फट वाढत गेल्यास येथे पावसाचे पाणी मुरण्याची जास्त शक्यता असते़ पुढील धोका टळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सिमेंटींग, वायरनेट, ग्राऊटींग करुन डोंगर एकसंघ ठेवता येऊ शकतो़ पुणे जिल्ह्यातील माळीण येथे भूस्खलनाच्या घटनेत अख्खे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ त्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या राज्यभरातील गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यासाठी आता राज्य शासनानेही उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे़, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे़