शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांकडून दबाव; उपविभागीय अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:34 IST

भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील ४०६ जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

सिल्लोड : भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी ज्या ४०६ जणांना बांगलादेशी संबोधून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यातील एकही बांगलादेशी नाही. बनावट कागदपत्रे देणाऱ्या तिघांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. एकही बांगलादेशी नागरिकाला आम्ही जन्म प्रमाणपत्र दिले नाही, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. असे असताना आपल्यावर उर्वरित ४०३ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी गुरुवारी माजी खा. किरीट सोमय्या यांच्यावर केला.

सिल्लोड तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी शहरातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील ४०६ जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या अनुषंगाने त्यांनी तिसऱ्यांदा गुरुवारी दुपारी १ वाजता सिल्लोडला येथे येऊन पोलिस ठाण्यास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेले षड्यंत्र आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ४० ते ५० वर्षांपूर्वी जन्मलेल्या तालुक्यातील ४०६ लोकांना केवळ आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिले आहे. यात फक्त तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित ४०३ जणांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह भाजपचे सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू आदी उपस्थित होते.

दोषी आढळल्यास कठोर कारवाई करूयापूर्वी खोटी कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात सोमय्या यांच्या तक्रारीचा समावेश करण्यात आला आहे. आता वरील लोकांची कागदपत्रे तपासून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर चौकशीत कुणी दोषी आढळले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल.-शेषराव उदार, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शहर

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्यावर दबावज्या ४०६ लोकांविरुद्ध सोमय्या यांनी तक्रार केली होती, त्यांची तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व नेमलेल्या पथकमार्फत चौकशी करण्यात आली आहे. ते नागरिक स्थानिक रहिवासी असल्याचे पुरावे आढळले आहेत. आम्ही एकही बांगलादेशीला जन्म प्रमाणपत्र दिले नाही. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे. कुणी बांगलादेशी आढळलाच नाही, तर आम्ही खोटे गुन्हे कसे दाखल करणार? ४०३ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. तसे केले नाही म्हणून माझ्यावर खोटे आरोप होत आहे.- लतीफ पठाण, उपविभागीय दंडाधिकारी, सिल्लोड

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर