शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 17:29 IST

शहरात पाच वर्षांपूर्वी बंद झालेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देजवळपास वर्षभर ही सेवा सुरू राहिली; पण त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि ही व्यवस्था मोडीत निघाली.

औरंगाबाद : शहरात पाच वर्षांपूर्वी बंद झालेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत विविध रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेण्यात आली. यात रिक्षाचालकांचे मत, अडचणी आणि त्यांना अपेक्षित या मुद्यांवर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.  

औरंगाबाद शहरात २०१३ मध्ये रेल्वेस्थानक परिसरात प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. यात तत्कालीन पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेतला होता. रेल्वेस्थानक ते बसस्थानक आणि रेल्वेस्थानक ते सिडको यादरम्यान मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर या मार्गांवरील प्रवासीभाडे निश्चित करण्यात आले. प्रवाशांची अडवणूक वा फसवणूक होऊ नये यासाठी रेल्वेस्थानक परिसरात छोटेखानी कार्यालय सुरू करण्यात आले. वाहतूक पोलीस मदतीला होते, तसेच  एका स्वयंसेवी संस्थेने संगणक आणि प्रिंटरही दिले होते. यातून ही सेवा सुरू झाली. काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याने या काळात रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील भाड्यावरून होणारे वाद टळले होते.

जवळपास वर्षभर ही सेवा या पद्धतीने सुरू राहिली; पण त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि ही व्यवस्था मोडीत निघाली. या सेवेबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सहायक पोलीस आयुक्त भापकर यांनी शहरातील विविध रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत रिक्षाचालकांच्या अडचणी व मते जाणून घेतली. त्याप्रमाणे त्यांना अपेक्षित काय आहे, याचाही आढावा घेण्यात आला. त्यांचे मुद्दे नोंद करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या संयुक्तपणे प्रीपेड आणि शेअरिंग रिक्षा स्टॅण्डसाठी काही पॉइंटस् निश्चित केले जाणार आहेत. याचा अंतिम अहवाल तयार करून तो मान्यतेसाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रिक्षांना बसवणार स्टिकर्सप्रीपेड आणि शेअरिंग सेवेत सहभागी झालेल्या रिक्षांना विशिष्ट प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येतील. यात वाहनाची सर्व माहिती असेल. ज्या रिक्षा यात सहभागी होतील त्यांनाच हे स्टिकर्स दिले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात पूर्वी सुरू असलेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू करण्याचा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा मानस आहे. त्यादृष्टीने रिक्षा चालक-मालक संघटनांची बैठक घेण्यात आली. यातील त्यांच्या मुद्यांची नोंद घेतली आहे. पोलीस आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर ही सेवा सुरू होईल.- एच.एस.भापकर, सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा, वाहतूक, औरंगाबाद. 

टॅग्स :Commissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद