शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

प्रतीशिवाजींना मोगलांनी डांबले होते धारूरच्या किल्ल्यात!

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

प्रताप नलावडे , बीड इतिहासात ज्यांचा उल्लेख प्रतीशिवाजी असा केला जायचा, त्या नेताजी पालकर यांना आठ महिने धारूरच्या किल्ल्यात मोगलांनी स्थानबध्द करून ठेवले होते

प्रताप नलावडे , बीडइतिहासात ज्यांचा उल्लेख प्रतीशिवाजी असा केला जायचा, त्या नेताजी पालकर यांना आठ महिने धारूरच्या किल्ल्यात मोगलांनी स्थानबध्द करून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध या किल्ल्याशी कधीच आलेला नसला तरी त्यांचे चुलते व वडील धारूरच्या किल्ल्याचे काही काळासाठी सुभेदार असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. हा किल्ला सातवाहनापासून ते अगदी निजामशाहीपर्यंतच्या अनेक घडामोडींची साक्ष आजही देत आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. सतीश साळुंके यांनीही शिवाजी महाराजांचा थेट संबंध बीड परिसराशी कधीच आलेला नव्हता, असे सांगतानाच नेताजी पालकर, महाराजांचे वडील शहाजीराजे आणि चुलते मालोजीराजे यांचा मात्र या परिसराशी निकटचा संबंध आला असल्याचे सांगितले. हिंदवी स्वराज्याचे दीर्घकाळ सरनौबत असणारे आणि अनेक लढायांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. पन्हाळ्याच्या मोहिमेतवेळेत न पोहोचल्यामुळे मराठी सैन्याची मोठी हानी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराजांनी समयास कैसा पावला नाहीस, असे म्हणत त्यांना बडतर्फ केले. यानंतर पालकर मोगलांना जाऊन मिळाले. मोगलांनी त्यांना धारूरच्या किल्ल्यात वास्तव्यास ठेवले. तब्बल आठ महिने पालकर या किल्ल्यात वास्तव्यास होते. महाराजांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर ‘सिवा सुटला आता प्रतीसिवा सुटता कामा नये’ असे म्हणत औरंगजेबाने पालकरांच्या अटकेचे आदेश काढले तो दिवस होता १९ आॅगस्ट १६६६. त्यावेळी पालकर मोगलांच्या छावणीत होते. मोगलांनी २४ आॅगस्टला त्यांना धारूरच्या किल्ल्यातच अटक केली. धारूरचा किल्ला हा भूईकोट किल्ला असला तरी भक्कम तटबंदी आणि चोहोबाजंूनी खंदकाचा वेढा असल्याने मुगलांना राज्यातील इतर किल्ल्यापेक्षा हा किल्ला खूपच सुरक्षित असल्याचे वाटत होते. त्यामुळेच पालकरांना अटक केल्यानंतरही काही काळ तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना आग्रा येथे औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वीत छळ करून पुढे त्यांना काबुल-कंदहारच्या मोहिमेवर रवाना केले. पुढे नऊ वर्षे ते या मोहिमेवर होते. दरम्यान काबुल मोहिमेनंतर दिलेरखानसोबत त्यांना मराठी मुलुखात पाठविण्यात आले. पालकर यांना चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप झाल्याने त्यांनी मे १६७६ मध्ये मोगली छावणीतून पलायन करत महाराजांकडे धाव घेतली. त्यांनीही तितक्याच विश्वासाने पालकरांना पुन्हा सैन्यात सामील करून घेतले.हिंदवी स्वराज्याचे दीर्घकाळ सरनौबत.४शिवाजी महाराजांचे उजवे हात म्हणून ओळख.४प्रतापगडावरील अफझलखान वधावेळी त्याची फौज पळवून लावण्याची मोठी कामगिरी.४अनेक लढाया जिंकल्या. महाराजांसारखेच शौर्य असल्याने प्रतीशिवाजी अशी त्यांची ओळख बनली होती.धारूर शहर हे अगदी सातवाहन काळापासून एक व्यापारी पेठ म्हणून प्रसिध्द होते. याच काळात शहराच्या सुरक्षिततेच्या विचारातून येथे किल्ला बांधण्यात आला. त्यावेळी त्याला महादुर्ग असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर पुढे आदिलशाही, मुगलशाही आणि निजामशाहीची स्थित्यंतरे या किल्ल्याने पाहिली. मोगलांनी धारूरचे नाव बदलून फतेहाबाद असे केले होते. आदिलशाहीत या किल्ल्याचेच दगड आणि माती वापरून पुन्हा १५६७ मध्ये याच ठिकाणी बांधकाम केले.