शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले अन्...', प्रकाश आंबेडकरांचा पोलीस आणि सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:30 IST

वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांनी औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या हिजाब गर्लचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांची भूमिका आणि सरकारवर निशाणा साधला.

औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील आमखास मैदानावर कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा भव्य सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी आयोजकांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले.

'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले''मी महाराष्ट्र सरकारला सेक्युलर समजत होतो, पण त्यांनी त्यांच्या कृतीतून सेक्युलरीझम सोडल्याचे दाखवून दिले. मी स्वतः कमीश्नरशी बोललो होतो, त्यांनी काहीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यांनी आम्हाला परवानगीही दिली, पण काल अचानक पोलिसांनी भूमिका बदलली आणि परवानगी नसल्याचे पत्र दिले. तसेच, काही औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी मैसूरला गेले आणि तिला औरंगाबादच्या कार्यक्रमाला न जाण्यास सांगितले, 144 कलमाची भीती घातली. कुणाच्या घरी जाऊन सत्कारास येऊ नका, असे पोलिसांनी सांगण्याची पहीलीच वेळ आहे,' असे ते म्हणाले.

'न्यायालयाच्या निकालानंतर भव्य कार्यक्रम करणार'ते पुढे म्हणाले की, 'पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आम्ही आज औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात आम्ही मुलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला असे सांगितले. मुस्लीम महिलांचा पेहराव कायद्याचा विषय होऊ शकत नाही. कोणी काय घालावं, हा ज्याचा त्याचा विष आहे. पोलिसांनी आम्हाला आयबीचा रिपोर्ट असल्याचे सांगितले. कोर्टातही पोलिसांनी तेच केले. आता कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलिसांना बाजू मांडण्यास सांगितली आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आम्ही पुढील तारीख ठरवू आणि यापेक्षा मोठा कार्यक्रम करू,' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबाद