शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तरुणाने मंडळाच्या पथकात रात्री उशिरापर्यंत ढोलचा सराव केला; घरी परतल्यानंतर घेतला गळफास

By राम शिनगारे | Updated: September 1, 2022 19:45 IST

१८ वर्षांच्या युवकाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही

औरंगाबाद : हर्सूल  परिसरातील गणेश मंडळाच्या ढोल पथकात रात्री उशिरापर्यंत सराव केल्यानंतर घरी आलेल्या १८ वर्षांच्या युवकाने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुमीत गौतम कोतकर (१८, रा. देहाडेनगर, अंबरहिल जटवाडा रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. सुमीत हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याला तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्याचे वडिल मातीकाम तर आई हॉटेलमध्ये कामाला आहे. सुमीत परिसरातील गणेश मंडळात ढोल वाजविण्याचा सराव करण्यासाठी बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. तेथून रात्री परत आल्यानंतर त्याने घरातील पत्र्याच्या छताला लावलेल्या पंख्याला ११ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. 

कुटुंबातील सदस्यांना दिसताच खाली उतरवुन घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी पहाटे मृत घोषीत केले. सुमीतने आत्महत्या कशामुळे केली, याचा उलगडा गुरुवारी रात्रीपर्यंत झाला नाही. त्याच्यावर हर्सूल परिसरात गुरुवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आई, वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे.

पाच वर्षांपूर्वी बहिणीची आत्महत्यासुमीत याने १७ व्या वर्षी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असतानाच त्याच्या मोठ्या बहिणीनेही पाच वर्षांपूर्वी १७ वर्षांची असताना जाळून घेत आत्महत्या केली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. १७ ते १८ या वयातच बहिणी-भावाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी