शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तरुणाने मंडळाच्या पथकात रात्री उशिरापर्यंत ढोलचा सराव केला; घरी परतल्यानंतर घेतला गळफास

By राम शिनगारे | Updated: September 1, 2022 19:45 IST

१८ वर्षांच्या युवकाने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही

औरंगाबाद : हर्सूल  परिसरातील गणेश मंडळाच्या ढोल पथकात रात्री उशिरापर्यंत सराव केल्यानंतर घरी आलेल्या १८ वर्षांच्या युवकाने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुमीत गौतम कोतकर (१८, रा. देहाडेनगर, अंबरहिल जटवाडा रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. सुमीत हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याला तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्याचे वडिल मातीकाम तर आई हॉटेलमध्ये कामाला आहे. सुमीत परिसरातील गणेश मंडळात ढोल वाजविण्याचा सराव करण्यासाठी बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. तेथून रात्री परत आल्यानंतर त्याने घरातील पत्र्याच्या छताला लावलेल्या पंख्याला ११ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. 

कुटुंबातील सदस्यांना दिसताच खाली उतरवुन घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी पहाटे मृत घोषीत केले. सुमीतने आत्महत्या कशामुळे केली, याचा उलगडा गुरुवारी रात्रीपर्यंत झाला नाही. त्याच्यावर हर्सूल परिसरात गुरुवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आई, वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे.

पाच वर्षांपूर्वी बहिणीची आत्महत्यासुमीत याने १७ व्या वर्षी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असतानाच त्याच्या मोठ्या बहिणीनेही पाच वर्षांपूर्वी १७ वर्षांची असताना जाळून घेत आत्महत्या केली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. १७ ते १८ या वयातच बहिणी-भावाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी