शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

पाऊस येताच वीजपुरवठा खंडित; महावितरण म्हणते अर्ध्या तासावर वीज ‘गुल’ तर फोन करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:05 IST

मान्सूनपूर्व कामे, तरीही अंधारात बसण्याचीच नागरिकांवर वेळ

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उन्हाळ्यात मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात आला. प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होताच वीज गेल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पाऊस नसतानाही वेळी-अवेळी वीज ‘गुल’ होण्याचा प्रकारही सुरूच आहे. त्यातही अर्ध्या तासावर वीजपुरवठा खंडित झाला तरच महावितरण नोंद घेते, अन्यथा नाही.

शहरात १० जून आणि १४ जून रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या दोन्ही दिवशी झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित होणे स्वाभाविक आहे. परंतु, पावसाचे चार-पाच थेंब पडत नाही, तोच लाईट जात असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्रत्येक वर्षी हाच त्रास किती दिवस सहन करायचा, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातही १५ ते २० मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होण्याची महावितरण नोंदच घेत नसल्याचे सांगण्यात आले. ट्रिपिंग झाल्यास वीजपुरवठा काही वेळातच सुरळीत होतो. परंतु, बिघाड (ब्रेकडाऊन) झाला तर दुरुस्तीनंतरच वीजपुरवठा सुरळीत होतो. शहरात गुरुवारी कुठेही खूप वेळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार नव्हता, असेही महावितरणने स्पष्ट केले.

किती फिडर पडले बंद?शहरात बुधवारी सायंकाळी विविध भागांतील २० फिडर बंद पडले. त्यामुळे कुठे तासभर, तर कुठे चार तास ‘बत्ती गुल’ होती.

नियंत्रण कक्षाला किती तक्रारी?महावितरणच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी तब्बल ३३९ तक्रारी आल्या. या कक्षाचा क्रमांक नागरिकांच्या तक्रारीने सतत ‘खणखणत’ असतो.

वारंवार फोन केल्याने कामात व्यत्ययपावसाळ्यात वादळ वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल, असे महावितरणने कळविले आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणelectricityवीज