शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

पाऊस येताच वीजपुरवठा खंडित; महावितरण म्हणते अर्ध्या तासावर वीज ‘गुल’ तर फोन करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:05 IST

मान्सूनपूर्व कामे, तरीही अंधारात बसण्याचीच नागरिकांवर वेळ

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उन्हाळ्यात मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात आला. प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होताच वीज गेल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पाऊस नसतानाही वेळी-अवेळी वीज ‘गुल’ होण्याचा प्रकारही सुरूच आहे. त्यातही अर्ध्या तासावर वीजपुरवठा खंडित झाला तरच महावितरण नोंद घेते, अन्यथा नाही.

शहरात १० जून आणि १४ जून रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या दोन्ही दिवशी झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित होणे स्वाभाविक आहे. परंतु, पावसाचे चार-पाच थेंब पडत नाही, तोच लाईट जात असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्रत्येक वर्षी हाच त्रास किती दिवस सहन करायचा, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातही १५ ते २० मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होण्याची महावितरण नोंदच घेत नसल्याचे सांगण्यात आले. ट्रिपिंग झाल्यास वीजपुरवठा काही वेळातच सुरळीत होतो. परंतु, बिघाड (ब्रेकडाऊन) झाला तर दुरुस्तीनंतरच वीजपुरवठा सुरळीत होतो. शहरात गुरुवारी कुठेही खूप वेळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार नव्हता, असेही महावितरणने स्पष्ट केले.

किती फिडर पडले बंद?शहरात बुधवारी सायंकाळी विविध भागांतील २० फिडर बंद पडले. त्यामुळे कुठे तासभर, तर कुठे चार तास ‘बत्ती गुल’ होती.

नियंत्रण कक्षाला किती तक्रारी?महावितरणच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी तब्बल ३३९ तक्रारी आल्या. या कक्षाचा क्रमांक नागरिकांच्या तक्रारीने सतत ‘खणखणत’ असतो.

वारंवार फोन केल्याने कामात व्यत्ययपावसाळ्यात वादळ वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल, असे महावितरणने कळविले आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणelectricityवीज