शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस येताच वीजपुरवठा खंडित; महावितरण म्हणते अर्ध्या तासावर वीज ‘गुल’ तर फोन करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:05 IST

मान्सूनपूर्व कामे, तरीही अंधारात बसण्याचीच नागरिकांवर वेळ

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उन्हाळ्यात मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात आला. प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होताच वीज गेल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पाऊस नसतानाही वेळी-अवेळी वीज ‘गुल’ होण्याचा प्रकारही सुरूच आहे. त्यातही अर्ध्या तासावर वीजपुरवठा खंडित झाला तरच महावितरण नोंद घेते, अन्यथा नाही.

शहरात १० जून आणि १४ जून रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या दोन्ही दिवशी झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित होणे स्वाभाविक आहे. परंतु, पावसाचे चार-पाच थेंब पडत नाही, तोच लाईट जात असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्रत्येक वर्षी हाच त्रास किती दिवस सहन करायचा, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातही १५ ते २० मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होण्याची महावितरण नोंदच घेत नसल्याचे सांगण्यात आले. ट्रिपिंग झाल्यास वीजपुरवठा काही वेळातच सुरळीत होतो. परंतु, बिघाड (ब्रेकडाऊन) झाला तर दुरुस्तीनंतरच वीजपुरवठा सुरळीत होतो. शहरात गुरुवारी कुठेही खूप वेळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार नव्हता, असेही महावितरणने स्पष्ट केले.

किती फिडर पडले बंद?शहरात बुधवारी सायंकाळी विविध भागांतील २० फिडर बंद पडले. त्यामुळे कुठे तासभर, तर कुठे चार तास ‘बत्ती गुल’ होती.

नियंत्रण कक्षाला किती तक्रारी?महावितरणच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी तब्बल ३३९ तक्रारी आल्या. या कक्षाचा क्रमांक नागरिकांच्या तक्रारीने सतत ‘खणखणत’ असतो.

वारंवार फोन केल्याने कामात व्यत्ययपावसाळ्यात वादळ वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल, असे महावितरणने कळविले आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणelectricityवीज