शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद

By विकास राऊत | Updated: July 22, 2023 19:47 IST

पक्षाच्या ‘घर-घर चलो’ अभियानातून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाने ९ महिन्यांनंतर जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली, मात्र त्यावरून पक्षांतर्गत खदखद वाढली आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना मानाची पदे दिली जात असल्यामुळे एक फळी नाराज झाली आहे. तर ज्येष्ठ विरुध्द कनिष्ठ असे वेगळेच शीतयुध्द पक्षात सुरू असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर या दुफळीचा परिणाम होण्याची चर्चा सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांसाठी एक जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी निश्चित करीत लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून १९ जुलै रोजी नियुक्त्या जाहीर केल्या. भाजपने प्रथमच संघटनेत असा प्रयोग केला असला तरी या प्रयोगाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पक्षाच्या ‘घर-घर चलो’ अभियानातून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचे चित्र आहे. त्यातच या अभियानासाठी छापण्यात आलेले पॉम्प्लेट्सही कार्यकर्त्यांनी तसेच ठेवल्याची चर्चा आहे.

कन्नड, वैजापूर, गंगापूर-खुलताबाद या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी संजय खांबायते यांची तर शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर तर फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड-सोयगाव या जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सुहास शिरसाट यांची नियुक्ती केली आहे.

खांबायते यांच्या निवडीवरून कन्नडसह गंगापूर व वैजापूरमधील भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे भाजपच्या गोटातून समजले आहे. तर फुलंब्रीतील शिरसाट यांच्या नियुक्तीमुळे दोन गट पडले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आल्यावर फुलंब्री नगर पंचायतीचे अध्यक्ष केले. आता जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद वाढली आहे. विजय औताडे हेदेखील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले. आठ वर्षांत त्यांना उपमहापौर, जिल्हाप्रमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख ही पदे पक्षाने दिली. अनुराधा चव्हाण यादेखील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्या, त्यांनाही पक्षाने विविध पदांवर काम करण्याची संधी दिली.

पडझड झाल्यास जबाबदार कोण?पक्षात जिल्ह्यात पदांवरून सुरू असलेल्या नाराजीमुळे पक्ष संघटनेची आगामी काळात पडझड झाल्यास कोण जबाबदार असेल, असा प्रश्न एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे. या सगळ्या नाराजीचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होईल, अशी भीती ज्येष्ठ व जुने पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपा