शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

लॉकडाऊनमुळे औरंगाबादवर दीर्घकालीन परिणामाची शक्यता; आढावा घेऊन पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 7:39 PM

उद्योगपती रिषी बागला यांची लॉकडाऊनचा दोन दिवसांत आढावा घेऊन प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी

ठळक मुद्दे कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत.

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये दोन-तीन दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयाची खरोखर गरज आहे का, याचा प्रशासनाने विचार करावा, अन्यथा औरंगाबादच्या उद्योगांवर याचा दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती उद्योजक रिषी बागला यांनी व्यक्त केली. 

औरंगाबादेत शुक्रवारपासून पुन्हा नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना उद्योजक रिषी बागला यांनी इथल्या उद्योग क्षेत्राबाबत होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासन चुकीचा निर्णय घेत नाही, हे मान्य आहे; परंतु या निर्णयामुळे औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. येथील अनेक उद्योग सिंगल सोर्सच्या माध्यमातून देश-विदेशातील उद्योगांना माल पुरवठा करीत आहेत. या लॉकडाऊनमुळे येथील उद्योग बंद राहतील व देश-विदेशात माल पुरवठा करण्याची चेन खंडित होईल. त्याची मोठी किंमत इथल्या उद्योगांना चुकवावी लागेल. याचा परिणाम येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर किती प्रमाणात होईल, किती उद्योग बंद पडतील, इथले काही उद्योग दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतील का, लोकांचा औरंगाबाद शहरावरील विश्वास कमी होईल का, ही वेळच सांगेल. 

ते म्हणाले, कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, हा संदेश जागतिक स्तरावर गेला तर येथील आॅरिक सिटी किंवा औद्योगिक वसाहतींवर काय परिणाम होऊ शकतो, ते पाहावे लागेल.  अजूनही प्रशासनाने दोन-तीन दिवसांत परिस्थितीचा आढावा घ्यावा. १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत. यामुळे व्यवहार सुरळीत चालतील, अर्थचक्र पूर्वपदावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बागला यांनी व्यक्त केली. 

संपूर्ण अर्थचक्र थांबेल : जिल्ह्याची २० लाख लोकसंख्या गृहीत धरली, तर सध्या ६ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहेत. म्हणजे, ०.३ टक्के लोक प्रभावित झालेले असून, ९९.७ टक्के लोक अजूनही कोरोनापासून दूर आहेत. या ०.३ टक्के संसर्ग झालेल्या लोकांसाठी संपूर्ण औरंगाबादकरांना वेठीस धरले आहे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. यामुळे संपूर्ण अर्थचक्र थांबणार आहे. लॉकडाऊनपेक्षा अन्य काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते, असे बागला म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी