शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांत संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:58 IST

साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी महामंडळाला महिन्याकाठी ५ कोटींवर उत्पन्न मिळत आहे. तरीही बसस्थानकाच्या नूतनीकरणासह प्रवासी सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे. 

मध्यवर्ती बसस्थानक आगाराच्या १४८ बस असून यातून दररोज १६ ते २० हजार प्रवाशांची वाहतूक होते. इतर विभागांच्या ये-जा करणाऱ्या बसेसचा आकडा दिवसभरात सातशेच्या घरात जातो. सप्टेंबर महिन्यात मध्यवर्ती बसस्थानकातून ५.६३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. हा आकडा अनेकदा ६ कोटींवर जातो. एकीकडे महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न गोळा केले जात आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. ज्यांच्यामुळे हे उत्पन्न मिळते, त्या प्रवाशांनाच मूलभूत सोयीसुविधाही दिल्या जात नाही.

स्थानकात आल्यावर बससाठी तासन्तास वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांसाठी थंडगार आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे मंडळाचे आद्यकर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्याच्या जागी प्रचंड अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे घाण पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा प्रवासी खिशातील चार पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. कर्मचाऱ्यांवरही हीच वेळ येत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. 

सुधारणा करावीमहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे म्हणाले, एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उत्पन्नही चांगले मिळते. तरीही मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था वाईट झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही; परंतु एसटी महामंडळाने बसस्थानकात सुधारणा केली पाहिजे.

छत कोसळण्याची भीतीमध्यवर्ती बसस्थानक बांधून अनेक वर्षे लोटली आहे. बसस्थानकाचे छत धोकादायक झाले आहे. हे छत कधीही कोसळू शकते,अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयास कळविली आहे; परंतु तरीही वेळीच खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली. वेळीच खबरदारी घेऊन बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम मार्गी लावण्याची गरज आहे. बसस्थानकाच्या उत्पन्नातून नूतनीकरण करावे,अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकstate transportएसटी