शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांत संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:58 IST

साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी महामंडळाला महिन्याकाठी ५ कोटींवर उत्पन्न मिळत आहे. तरीही बसस्थानकाच्या नूतनीकरणासह प्रवासी सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासी संघटनांतून संताप व्यक्त होत आहे. 

मध्यवर्ती बसस्थानक आगाराच्या १४८ बस असून यातून दररोज १६ ते २० हजार प्रवाशांची वाहतूक होते. इतर विभागांच्या ये-जा करणाऱ्या बसेसचा आकडा दिवसभरात सातशेच्या घरात जातो. सप्टेंबर महिन्यात मध्यवर्ती बसस्थानकातून ५.६३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. हा आकडा अनेकदा ६ कोटींवर जातो. एकीकडे महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न गोळा केले जात आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. ज्यांच्यामुळे हे उत्पन्न मिळते, त्या प्रवाशांनाच मूलभूत सोयीसुविधाही दिल्या जात नाही.

स्थानकात आल्यावर बससाठी तासन्तास वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांसाठी थंडगार आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे मंडळाचे आद्यकर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्याच्या जागी प्रचंड अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे घाण पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा प्रवासी खिशातील चार पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. कर्मचाऱ्यांवरही हीच वेळ येत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. 

सुधारणा करावीमहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे म्हणाले, एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उत्पन्नही चांगले मिळते. तरीही मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था वाईट झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही; परंतु एसटी महामंडळाने बसस्थानकात सुधारणा केली पाहिजे.

छत कोसळण्याची भीतीमध्यवर्ती बसस्थानक बांधून अनेक वर्षे लोटली आहे. बसस्थानकाचे छत धोकादायक झाले आहे. हे छत कधीही कोसळू शकते,अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयास कळविली आहे; परंतु तरीही वेळीच खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली. वेळीच खबरदारी घेऊन बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम मार्गी लावण्याची गरज आहे. बसस्थानकाच्या उत्पन्नातून नूतनीकरण करावे,अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकstate transportएसटी