शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

औरंगाबादच्या प्रदूषण पातळीत १० ते १५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:47 IST

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे.

ठळक मुद्देबिघडते पर्यावरण : उन्हाची तीव्रता आणि कचरा जाळण्याचाही परिणाम भोगताहेत शहरवासीय

रुचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. उन्हाळ्यात कोरड्या हवेमुळे शहराची प्रदूषण पातळी वाढतच असते. त्याचप्रमाणे उन्हाळा सुरू झाल्यापासून यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, यासाठी अनेक घटकांप्रमाणे कचरा जाळणे हा घटकही कारणीभूत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी ही समस्या आता शहरवासीयांच्या आरोग्यावरही घातक परिणाम करीत आहे.शहरात कचºयाची समस्या निर्माण झाल्यापासून प्रत्येक वॉर्डात फिरून कचरा गोळा करणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी एकत्रित कचरा घेण्यास नकार देतात. कचरा वर्गीकरण करून द्यावा, एवढी या लोकांची अपेक्षा आहे. मात्र अनेक भागांतील नागरिकांना या गोष्टीचा कंटाळा असल्यामुळे किंवा काही भागांत घंटागाडी पोहोचत नसल्यामुळे नागरिक हा कचरा रस्त्याच्या दुभाजकांवर किंवा मग परिसरातील मोकळ्या जागेवर जमा करतात आणि सर्रास पेटवून देतात.सायंकाळी वातावरण थंड झाल्यावर किंवा अगदी पहाटेच हा कचरा जाळला जातो. कचरा जाळताना त्यात ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक चे तुकडे, अशा सर्वच प्रकारचा कचरा एकत्र असतो. एकदा कचरा जाळल्यानंतर पुढे चार ते पाच तास तो धुमसत राहतो आणि त्या धुरातून बाहेर पडणारे विषारी वायू पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचे काम करतात.उन्हाळा असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरण थंड झाले की, अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी आणि लहान मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. पण जळणाºया कचºयामुळे मात्र नाक बंद करूनच बाहेर पडावे लागत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.आरोग्यासाठी धोकादायकमोकळ्या हवेत कचरा जाळल्यामुळे त्यातून डायआॅक्झिन्स, सल्फर, पारा, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, अर्सेनिक, असे घातक वायू वातावरणात प्रवेश करतात. हे वायू श्वसनासोबत थेट शरीरात जाऊन श्वसन क्रियेवर परिणाम करतात. यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. दमा, अस्थमा हे आजार असणाºयांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि लहान बालकांसाठी हे वायू अत्यंत घातक आहेत. डोळे चुरचुरणे, मळमळणे, डोके जड पडणे, अंगावर रॅश येणे, असे आजारही या धुरामुळे होऊ शकतात.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न