शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या प्रदूषण पातळीत १० ते १५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:47 IST

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे.

ठळक मुद्देबिघडते पर्यावरण : उन्हाची तीव्रता आणि कचरा जाळण्याचाही परिणाम भोगताहेत शहरवासीय

रुचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. उन्हाळ्यात कोरड्या हवेमुळे शहराची प्रदूषण पातळी वाढतच असते. त्याचप्रमाणे उन्हाळा सुरू झाल्यापासून यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, यासाठी अनेक घटकांप्रमाणे कचरा जाळणे हा घटकही कारणीभूत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी ही समस्या आता शहरवासीयांच्या आरोग्यावरही घातक परिणाम करीत आहे.शहरात कचºयाची समस्या निर्माण झाल्यापासून प्रत्येक वॉर्डात फिरून कचरा गोळा करणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी एकत्रित कचरा घेण्यास नकार देतात. कचरा वर्गीकरण करून द्यावा, एवढी या लोकांची अपेक्षा आहे. मात्र अनेक भागांतील नागरिकांना या गोष्टीचा कंटाळा असल्यामुळे किंवा काही भागांत घंटागाडी पोहोचत नसल्यामुळे नागरिक हा कचरा रस्त्याच्या दुभाजकांवर किंवा मग परिसरातील मोकळ्या जागेवर जमा करतात आणि सर्रास पेटवून देतात.सायंकाळी वातावरण थंड झाल्यावर किंवा अगदी पहाटेच हा कचरा जाळला जातो. कचरा जाळताना त्यात ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक चे तुकडे, अशा सर्वच प्रकारचा कचरा एकत्र असतो. एकदा कचरा जाळल्यानंतर पुढे चार ते पाच तास तो धुमसत राहतो आणि त्या धुरातून बाहेर पडणारे विषारी वायू पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचे काम करतात.उन्हाळा असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरण थंड झाले की, अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी आणि लहान मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. पण जळणाºया कचºयामुळे मात्र नाक बंद करूनच बाहेर पडावे लागत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.आरोग्यासाठी धोकादायकमोकळ्या हवेत कचरा जाळल्यामुळे त्यातून डायआॅक्झिन्स, सल्फर, पारा, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, अर्सेनिक, असे घातक वायू वातावरणात प्रवेश करतात. हे वायू श्वसनासोबत थेट शरीरात जाऊन श्वसन क्रियेवर परिणाम करतात. यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. दमा, अस्थमा हे आजार असणाºयांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि लहान बालकांसाठी हे वायू अत्यंत घातक आहेत. डोळे चुरचुरणे, मळमळणे, डोके जड पडणे, अंगावर रॅश येणे, असे आजारही या धुरामुळे होऊ शकतात.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न