शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद मनपाला ६ महिन्यांपूर्वीच दिला होता इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:07 IST

संतोष हिरेमठ । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेला घनकचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट ...

ठळक मुद्देकचऱ्याचा नियमच खड्ड्यात : अशास्त्रीय पद्धतीने कच-याची विल्हेवाट

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेला घनकचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा इशारा दिला होता. याकडे तब्बल सहा महिने डोळेझाक केलेल्या महापालिकेने शहरातील कचराकोंडीत आणखी कहरच केला आहे. कोणत्याही वर्गीकरणाशिवाय थेट कचरा खड्ड्यांमध्ये जिरविण्याचा उद्योग सुरू आहे. कचरा विल्हेवाटीचा नियमच खड्ड्यात घातला जात असल्याने आगामी कालावधीत अनेक परिणामांना सामोरे जाण्याचा धोका व्यक्त होत आहे.योग्य नियोजन केले तर कच-यातील टाकाऊ पदार्थसुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो; परंतु शहरातील कच-याचा प्रश्न महापालिकेच्या अजब कारभारामुळे आरोग्य आणि पर्यावरण -हास या दृष्टीने गंभीर बनला आहे.१६ फेब्रुवारी रोजी नारेगाव येथे आंदोलन सुरू झाल्यानंतर शहरातील कचरा सेंट्रल नाका येथे गोळा करण्यात आला. या ठिकाणी महिनाभरात मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढिगार झाले. महापालिकेने या ठिकाणी खड्डे खोदून कचरा टाकून दिला; परंतु हा कचरा खड्ड्यात टाकताना कोणत्याही प्रकारे वर्गीकरण करण्यात आले नाही. हा प्रकार एकट्या सेंट्रल नाका येथे होत नाही. महापालिकेने ज्या ज्या ठिकाणी कचरा खड्ड्यांमध्ये जिरविला, तेथेही कोणतेही वर्गीकरण करण्यात आले नाही. शहरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी मनपाने अनेक जागांचा शोध घेतला; परंतु प्रत्येक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी विरोध झाला. त्यामुळे हतबल झालेल्या महापालिकेवर अशापद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावण्याची वेळ आल्याचे म्हटले जात आहे; परंतु वास्तविक आॅगस्ट २०१७ मध्येच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मनपा आयुक्तांना नोटीस बजावली होती. ४५० मे. टन प्रतिदिन इतक्या घनकचºयावर विनाप्रक्रिया आसपासच्या परिसरात अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. नागरी घनकचºयाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन न केल्यास होणाºया प्रदूषणाबाबत पुरावे सादर करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिला होता. त्याचा महापालिकेला विसर पडल्याचे शहरातील सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ सध्याच्या स्थितीवरून काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.असा आहे कचरा...टाकाऊ कागद, कागदी वस्तू, विविध प्रकारची वेष्टणे, चमड्याच्या वस्तू, जळालेला कचरा, खराब अन्न, झाडांची पाने, घरातील कालबाह्य औषधी, गोळ्या आणि प्लास्टिक असा सगळा कचरा वर्गीकरण न करताच खड्ड्यात टाकून मनपा मोकळे होत आहे. यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा कचरा जिरविताना कोणत्याही परिणामांचा विचार केला जात नाही. या सगळ्या बाबी भू-प्रदूषणाला हातभार लावत आहेत.काय आहे नियम?पर्यावरण, वने व वातावरणातील बदल मंत्रालयातर्फे घनकचरा व्यवस्थापन २०१६ हे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत प्रसारित केला आहे. या नियमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेने निर्माण होणाºया नागरी घनकचºयाची योग्य ती वर्गवारी करून त्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. जैविक, विघटनशील, अविघटनशील, पुनर्वापर घनकचºयाची विल्हेवाट नियमानुसार लावणे बंधनकारक आहे; परंतु महापालिका नियमाकडे दुर्लक्ष करून सरसकट कचरा जमिनीमध्ये पुरत असल्याचे दिसते.आजार बळावण्याची शक्यतासरसकट कचरा जमिनीत पुरल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा कुजल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिकांवर येईल. पावसाळ्यात कचरा पुरलेल्या जमिनीवरील पाणी जलवाहिनीच्या संपर्कात येऊन जलजन्य आणि साथीच्या आजारांचा धोका बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका