शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सत्ताकारण ! काँग्रेसचे अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 19:01 IST

प्रमुख सदस्यांना चर्चेसाठी मुंबईचे निमंत्रण

ठळक मुद्दे११ सदस्यांची जुळवाजुळव करण्याच्या हालचालीजि.प. अध्यक्षांना मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा

औरंगाबाद : विधानसभेतील   विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी आपल्यासोबत जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या १०-१२ सदस्यांचा प्रवेश घडवून आणण्याची व्यूहरचना आखली असून, यासंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख जि.प. सदस्यांना उद्या मुंबईत चर्चेसाठी बोलाविले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसोबत जवळीक वाढविली. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना सोबत औरंगाबाद जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या १०-१२ सदस्यांना घेऊन जाण्याबाबत त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. उद्या मुंबईत यासंदर्भात काही प्रमुख जि.प. सदस्यांसोबत चर्चा केली जाणार आहे, तसा निरोप सदस्यांना मिळाला आहे. 

जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. यापुढे जिल्हा परिषदेतील सेनेसोबतची आघाडी तोडून भाजपसोबत घरोबा करण्याचा निर्णय बंडखोर काँग्रेस सदस्यांनी घेतला आहे. यासाठी अगोदर काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करावा लागणार आहे. गट स्थापन करण्यासाठी एकूण १६ काँग्रेस सदस्यांपैकी दोन तृतियांश सदस्य म्हणजे ११ सदस्य एकत्र आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून सध्या ११ सदस्यांची जुळवाजुळव सुरू आहे. गट स्थापन करण्यापूर्वी या सदस्यांनी पाऊल उचलले, तर त्यांचे जि.प. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे काँग्रेसच्या स्वतंत्र गटात सहभागी होण्यासाठी उद्याच्या मुंबईतील बैठकीत सदस्यांसोबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

अध्यक्ष ‘सेफ झोन’मध्येकाँग्रेसच्या जि.प. सदस्यांचा भाजपसोबत सत्ता स्थापण्याकडे कल, या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झाली. त्यानंतर जि.प.तील सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. हाती असलेली सत्ता जाऊ नये, यासाठी अध्यक्ष व काही सभापतींनी वरिष्ठ पातळीवर ‘फिल्डिंग’ लावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जि.प. अध्यक्षांना चार-पाच महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी अनेक जि.प. अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा भाजपच्याच ताब्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष किंवा इच्छुकांची नाराजी नको, म्हणून जि.प. अध्यक्षांना मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा आज दिवसभर जिल्हा परिषदेत होती. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदcongressकाँग्रेस