शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पाण्यावरून रंगले राजकारण; शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 15:06 IST

कुणी आणली योजना यावरून दोन्ही पक्षात राजकारण सुरु 

ठळक मुद्देभाजपकडून पाणीयोजनेला आमचा विरोध नाही, कारण ही योजनाच भाजपाने आणलेली आहे, असे सांगण्यात येत आहे. पाणीयोजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केली असून शहरासह सातारा- देवळाईच्या नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद : मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या औरंगाबादच्या जनतेला पाणी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा असताना १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जलयोजनेचे उद्‌घाटन होत आहे. याचवेळी भाजपने ही पाणीयोजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केल्याचे सांगत याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

पाणीयोजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केली असून शहरासह सातारा- देवळाईच्या नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपकडून पाणीयोजनेला आमचा विरोध नाही, कारण ही योजनाच भाजपाने आणलेली आहे, असे सांगण्यात येत आहे. शहरासाठी २००८ साली मंजूर झालेल्या समांतर जलवाहिनी योजनेची अंमलबजावणी न होताच ती योजना बंद करण्यात आली. आता ही नवी जलयोजना समांतरच्या दिशेने जाईल, असा सूर भाजपने आळवला आहे. शिवसेनेने मात्र या योजनेची अंमलबजावणी धुमधडाक्यात करण्याचे ठरविले आहे. दोन्ही पक्षांकडून शहरात श्रेयवादाची लढाई असून पोस्टरबाजीही रंगली आहे. हे राजकारण रंगण्यामागे आगामी महापालिका  निवडणुकीचे गणित असून आम्हीच जनतेला पाणी दिल्याचे श्रेय घेण्याचा हा वाद दिसून येत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद