शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

बछड्यांच्या बारशातही कुरघोडी; ‘आदित्य’ नाव ठेवण्यास शिंदे, पवार, मुनगंटीवारांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 19:50 IST

‘आदित्य’ नाव नको, दुसरी चिठ्ठी काढा; आदित्यचं नाव डावललं सरकारनं...

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बछड्यांच्या बारशाचा कार्यक्रम १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उरकला. या बारशावरून राजकीय घुगऱ्या मात्र शिजल्या. बछड्याचे ‘आदित्य’ नाव ठेवण्यास तिन्ही मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले.

बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. चिठ्ठ्या काढत असताना ‘आदित्य’ नावाची एक चिठ्ठी निघाली. ती पाहताच मुनगंटीवार म्हणाले ‘आदित्य’ नको, दुसरी चिठ्ठी काढा, त्यानंतर ‘आदित्य’ ऐवजी ‘कान्हा’ नाव ठेवण्यात आले.

महापालिका प्राणिसंग्रहालयात पांढरी वाघीण अर्पिताने ७ सप्टेंबरला पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. नागरिकांकडून बछड्यांच्या बारशासाठी नावे मागविण्यात आली होती. दरम्यान, बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात राजकारण आल्यामुळे राजकारणाची पातळी कुठंपर्यंत पोहोचली आहे, यावरून उपस्थितांमध्ये जाेरदार चर्चा होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावामुळेच चिठ्ठी बदलली काय, यावर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, दोन चिठ्ठ्या एकदम निघाल्या, त्यामुळे एकच काढली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मला तर काहीही आठवत नाही.

नावाच्या राजकारणावर कोण काय म्हणाले?खा. इम्तियाज जलिल म्हणाले, वाघाच्या बछड्याला काय नाव द्यावे, हा ज्याचा त्याचा विषय असला तरी राजकारण किती खालच्या पातळीवर गेले, हे यातून पाहायला मिळाले.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जंगलातील वाघाच्या बछड्यांचे नामकरण होत नाही. उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना नावे दिली जातात. नाव देताना कोणतेही वाद निर्माण करण्याची गरज नाही.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, हे कोणताही ‘आदित्य’ लपवू शकत नाहीत. आदित्य ठाकरे कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.

टॅग्स :TigerवाघAurangabadऔरंगाबाद