शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बछड्यांच्या बारशातही कुरघोडी; ‘आदित्य’ नाव ठेवण्यास शिंदे, पवार, मुनगंटीवारांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 19:50 IST

‘आदित्य’ नाव नको, दुसरी चिठ्ठी काढा; आदित्यचं नाव डावललं सरकारनं...

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बछड्यांच्या बारशाचा कार्यक्रम १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उरकला. या बारशावरून राजकीय घुगऱ्या मात्र शिजल्या. बछड्याचे ‘आदित्य’ नाव ठेवण्यास तिन्ही मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले.

बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. चिठ्ठ्या काढत असताना ‘आदित्य’ नावाची एक चिठ्ठी निघाली. ती पाहताच मुनगंटीवार म्हणाले ‘आदित्य’ नको, दुसरी चिठ्ठी काढा, त्यानंतर ‘आदित्य’ ऐवजी ‘कान्हा’ नाव ठेवण्यात आले.

महापालिका प्राणिसंग्रहालयात पांढरी वाघीण अर्पिताने ७ सप्टेंबरला पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. नागरिकांकडून बछड्यांच्या बारशासाठी नावे मागविण्यात आली होती. दरम्यान, बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात राजकारण आल्यामुळे राजकारणाची पातळी कुठंपर्यंत पोहोचली आहे, यावरून उपस्थितांमध्ये जाेरदार चर्चा होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावामुळेच चिठ्ठी बदलली काय, यावर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, दोन चिठ्ठ्या एकदम निघाल्या, त्यामुळे एकच काढली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मला तर काहीही आठवत नाही.

नावाच्या राजकारणावर कोण काय म्हणाले?खा. इम्तियाज जलिल म्हणाले, वाघाच्या बछड्याला काय नाव द्यावे, हा ज्याचा त्याचा विषय असला तरी राजकारण किती खालच्या पातळीवर गेले, हे यातून पाहायला मिळाले.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जंगलातील वाघाच्या बछड्यांचे नामकरण होत नाही. उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना नावे दिली जातात. नाव देताना कोणतेही वाद निर्माण करण्याची गरज नाही.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, हे कोणताही ‘आदित्य’ लपवू शकत नाहीत. आदित्य ठाकरे कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.

टॅग्स :TigerवाघAurangabadऔरंगाबाद