शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

राजकीय अनास्थेचा मराठवाड्याला फटका, अवघ्या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:52 IST

दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकारातून बाब समोर नांदेड विभागात ८९३ कि.मी.चा रेल्वे मार्ग

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : राजकीय अनास्थेचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील रेल्वे विकासाला बसत आहे. वर्षानुवर्षे रेल्वे प्रकल्प कागदावरच आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात तब्बल ८९३ कि. मी.चा रेल्वे मार्ग आहे; परंतु यात केवळ ८१.८५० कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे, तर फक्त ३७ कि.मी. विद्युतीकरण झाले आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती पुढे आली असून, मराठवाड्यातील खासदारांनी आतातरी जागे व्हावे, अशी अपेक्षा रेल्वे संघटनांकडून व्यक्त होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे. दुहेरीकरणाचा हा प्रस्तावही थंडबस्त्यात गेला आहे. या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्या तरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले आहे. मनमाड-परभणी हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही प्रस्तावाला मंजुरीच मिळालेली नाही. त्यामुळे हा खर्चही वाढल्याची शक्यता आहे. एकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे धावतात. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. एकेरी मार्गावर इंजिन नादुरुस्त झाले तर संपूर्ण वाहतूकच विस्कळीत होते, तरीही दुहेरीकरणाचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. राजकीय पाठपुरावा कमी पडत असल्याची ही परिस्थिती ओढावत असल्याची ओरड होत आहे.

खासदारांनी जागे व्हावेमाहिती अधिकारात दुहेरीकरण, विद्युतीकरणाची माहिती मागितली होती. तेव्हा नांदेड विभागात ८९३ कि.मी. पैकी केवळ ८१ कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण आणि ३७ कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण झाल्याची माहिती मिळाली. दक्षिण मध्य रेल्वेच्या अन्य विभागांत पूर्ण विद्युतीकरण, दुहेरीकरण झाले आहे. मराठवाड्यावरच अन्याय होत आहे. मराठवाड्यातील खासदारांनी आता तरी जागे झाले पाहिजे.- गौतम नाहाटा, अध्यक्ष, नमो रेल्वे संघटना

पुढील अर्थसंकल्पात दुहेरीकरणमनमाड-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुढील म्हणजे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात घेतले जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. विद्युतीकरणाला मंजुरी मिळाली आहे. निविदाही पूर्ण झाली आहे. रेल्वेमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरच विद्युतीकरणाचे भूमिपूजन केले जाईल.- खा. डाॅ. भागवत कराड

टॅग्स :Marathwadaमराठवाडाrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद