शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 18:13 IST

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अटक व सुटका

ठळक मुद्देपोलिसांनी कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. 

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लॉकडाऊनच्या सामान्य वीजग्राहकांना दिलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात काढलेला मोर्चा पोलीसांनी औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकातच रोखला. मोर्चेकरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करून सोडले.

महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मनसेने सामान्य वीजग्राहकांना सोबत घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मोर्चाच्या दोन दिवसांपूर्वी मनसेने मुख्य अभियंता भूजंग खंदारे यांच्यावर वाढीव वीजबिले भिरकावून निषेध केला होता. त्यानंतर गुरूवारी मोर्चाचे नियोजन केले होते. परंतु काल २५ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस एच.एस.भापकर यांनी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू असून संचारबंदी सुरू, ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याचे कळविले होते. कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. 

आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असेही सपोआ भापकर यांनी म्हटले होते. नोटीस देऊन मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्याउपरही मनसेने गुरूवारी महात्मा फुले चौकातून मोर्चा काढण्याचा तयारी केली. सकाळी ९ वाजेपासून चौकात पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता. मोर्चेकरी चौकात येताच, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होता मोर्चाजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रासह मोर्चाचे नियोजन होते. परंतु पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्योन ठाकरे यांचे पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख सुहाय दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, अशोक पवार, प्रशांत जोशी, संदीप कुलकर्णी, चेतन पाटील, वृषभ रगडे आदींना पोलीसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन