शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 18:13 IST

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अटक व सुटका

ठळक मुद्देपोलिसांनी कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. 

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लॉकडाऊनच्या सामान्य वीजग्राहकांना दिलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात काढलेला मोर्चा पोलीसांनी औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकातच रोखला. मोर्चेकरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करून सोडले.

महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मनसेने सामान्य वीजग्राहकांना सोबत घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मोर्चाच्या दोन दिवसांपूर्वी मनसेने मुख्य अभियंता भूजंग खंदारे यांच्यावर वाढीव वीजबिले भिरकावून निषेध केला होता. त्यानंतर गुरूवारी मोर्चाचे नियोजन केले होते. परंतु काल २५ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस एच.एस.भापकर यांनी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू असून संचारबंदी सुरू, ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याचे कळविले होते. कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. 

आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असेही सपोआ भापकर यांनी म्हटले होते. नोटीस देऊन मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्याउपरही मनसेने गुरूवारी महात्मा फुले चौकातून मोर्चा काढण्याचा तयारी केली. सकाळी ९ वाजेपासून चौकात पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता. मोर्चेकरी चौकात येताच, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होता मोर्चाजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रासह मोर्चाचे नियोजन होते. परंतु पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्योन ठाकरे यांचे पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख सुहाय दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, अशोक पवार, प्रशांत जोशी, संदीप कुलकर्णी, चेतन पाटील, वृषभ रगडे आदींना पोलीसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन