शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘वन स्टेट, वन चालान’चा पोलिसांकडून अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 20:23 IST

राज्यात कोठेही नियमाचे उल्लंघन करून दंड न भरता शहरात आलेल्या वाहनधारकांवर कारवाई 

ठळक मुद्दे१ मेपासून ९ हजार ८८८ वाहनचालकांवर कारवाईदुसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहन होते जमा

औरंगाबाद : राज्यात कोठेही वाहतूक नियम मोडल्यानंतर दंड न भरलेल्या वाहनाच्या चालकाला राज्यातील कोणत्याही शहरात वाहतूक नियम मोडताना दुसऱ्यांदा पकडले, तर ‘वन स्टेट, वन चालान’ या संकल्पनेनुसार त्या वाहनचालकाकडून यापूर्वीचा दंड वसूल केला जातो; अन्यथा ते वाहन जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक पोलिसांनी ‘वन स्टेट, वन चालान’प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणे, मुंबई शहरांत वाहतूक नियम मोडून दंड न भरता औरंगाबादेत आलेल्या वाहनचालकांकडून येथे दंड वसूल केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, वाहनचालक नियम मोडून वाहने चालवीत असतात. राज्य सरकारने आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘वन स्टेट, वन चालान’ प्रणालीचा वापर सुरू केला. हे ई-चालान असून, वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून शक्य असेल, तर एटीएम कार्ड, डेबिट कार्ड स्वॅप करून आॅनलाईन दंड भरून घ्यावा, असे निर्देश दिले. १ मेपासून औरंगाबाद शहर वाहतूक पोलीस ई-चालानचा वापर करीत आहे. याकरिता शहरातील पाच वाहतूक विभागांतर्गत शंभर ई-चालान डिव्हाईस वाटप करण्यात आले आहे. हे डिव्हाईस वापरण्याचे प्रशिक्षण गत महिन्यात वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते.

१ मेपासून ९ हजार ८८८ वाहनचालकांवर कारवाईई-चालान डिव्हाईसचा वापर १ मेपासूनच सुरू झाला. तेव्हापासून कालपर्यंत ९ हजार ८८८ वाहनचालकांना वाहतूक नियम मोडताना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना ई-चालान करून त्यांच्याकडून २४ लाख ९७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती एसीपी काकडे यांनी दिली. ते म्हणाले की, ज्या वाहनचालकांकडे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड नसेल आणि ते जागेवर दंड भरण्यास असमर्थता दर्शवीत असतील, त्या वाहनचालकांच्या गाडीच्या कागदपत्रांवर आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर दंड (अनपेड) बाकी असल्याचे नमूद असते. 

दुसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहन होते जमाजे वाहनचालक नियम मोडल्यानंतर दंड भरत नाहीत, त्या वाहनचालकांची सर्व माहिती (डेटा) आॅनलाईन साठवून ठेवली जाते. दुसऱ्यांदा नियम मोडताना त्यांना पकडण्यात आले, तर मागील दंड वसूल करून घेतला जातो. मात्र, यावेळीही जर वाहनचालक दंड भरत नसेल, तर त्याचे वाहन जमा करून घेतले जाते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद