शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

‘वन स्टेट, वन चालान’चा पोलिसांकडून अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 20:23 IST

राज्यात कोठेही नियमाचे उल्लंघन करून दंड न भरता शहरात आलेल्या वाहनधारकांवर कारवाई 

ठळक मुद्दे१ मेपासून ९ हजार ८८८ वाहनचालकांवर कारवाईदुसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहन होते जमा

औरंगाबाद : राज्यात कोठेही वाहतूक नियम मोडल्यानंतर दंड न भरलेल्या वाहनाच्या चालकाला राज्यातील कोणत्याही शहरात वाहतूक नियम मोडताना दुसऱ्यांदा पकडले, तर ‘वन स्टेट, वन चालान’ या संकल्पनेनुसार त्या वाहनचालकाकडून यापूर्वीचा दंड वसूल केला जातो; अन्यथा ते वाहन जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक पोलिसांनी ‘वन स्टेट, वन चालान’प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणे, मुंबई शहरांत वाहतूक नियम मोडून दंड न भरता औरंगाबादेत आलेल्या वाहनचालकांकडून येथे दंड वसूल केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, वाहनचालक नियम मोडून वाहने चालवीत असतात. राज्य सरकारने आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘वन स्टेट, वन चालान’ प्रणालीचा वापर सुरू केला. हे ई-चालान असून, वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून शक्य असेल, तर एटीएम कार्ड, डेबिट कार्ड स्वॅप करून आॅनलाईन दंड भरून घ्यावा, असे निर्देश दिले. १ मेपासून औरंगाबाद शहर वाहतूक पोलीस ई-चालानचा वापर करीत आहे. याकरिता शहरातील पाच वाहतूक विभागांतर्गत शंभर ई-चालान डिव्हाईस वाटप करण्यात आले आहे. हे डिव्हाईस वापरण्याचे प्रशिक्षण गत महिन्यात वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते.

१ मेपासून ९ हजार ८८८ वाहनचालकांवर कारवाईई-चालान डिव्हाईसचा वापर १ मेपासूनच सुरू झाला. तेव्हापासून कालपर्यंत ९ हजार ८८८ वाहनचालकांना वाहतूक नियम मोडताना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना ई-चालान करून त्यांच्याकडून २४ लाख ९७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती एसीपी काकडे यांनी दिली. ते म्हणाले की, ज्या वाहनचालकांकडे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड नसेल आणि ते जागेवर दंड भरण्यास असमर्थता दर्शवीत असतील, त्या वाहनचालकांच्या गाडीच्या कागदपत्रांवर आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर दंड (अनपेड) बाकी असल्याचे नमूद असते. 

दुसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहन होते जमाजे वाहनचालक नियम मोडल्यानंतर दंड भरत नाहीत, त्या वाहनचालकांची सर्व माहिती (डेटा) आॅनलाईन साठवून ठेवली जाते. दुसऱ्यांदा नियम मोडताना त्यांना पकडण्यात आले, तर मागील दंड वसूल करून घेतला जातो. मात्र, यावेळीही जर वाहनचालक दंड भरत नसेल, तर त्याचे वाहन जमा करून घेतले जाते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद