शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; कंटाळून तक्रारदारानेच केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:26 IST

दोन मुलींचा विवाह केल्यापासून तक्रारदार आर्थिक अडचणीत होते.

ठळक मुद्देकर्जाच्या आमिषाने ४ लाख घेऊन गंडवले पोलिसांचा निष्काळजीपणा; नातेवाईकांचा आरोप 

औरंगाबाद : २५ लाख रुपये कर्ज काढून देण्याच्या आमिषाने ४ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध तक्रार करून महिनाभरानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे हताश झालेल्या तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना पदमपुरा येथे मंगळवारी सकाळी समोर आली. वेदांतनगर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. 

सुरेश शेकूजी पाटील (५२, रा. सुयोग कॉलनी, पदमपुरा) असे मृताचे नाव आहे, तर संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई, ता. गंगापूर) आणि त्याचा पुतण्या प्रफुल्ल नंदू साबळे (रा. भवानीनगर), अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. मृत पाटील हे डिजिटल बॅनर जाहिरात करणाऱ्या खाजगी कंपनीत  व्यवस्थापक होते.  दोन मुलींचा विवाह केल्यापासून पाटील आर्थिक अडचणीत होते. आरोपी संजय साबळे एकदा पाटील यांच्या घरी आला व त्याचे भाऊजी शिर्डीतील  बँकेचे  संचालक असून, २५ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ५  लाख रुपये खर्च येईल, असेही त्याने सांगितले. पाटील यांनी  तयारी दर्शविताच आरोपीने २ कोरे धनादेश, २  फोटो, आधार कार्ड आणि  पॅन कार्ड घेतले. 

साबळेने त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये नेले. तो  पैसे नेण्यासाठी त्याचा पुतण्या प्रफुल्ल यास पाठवीत असे. पाटील यांनी क्रेडिट कार्डमधील ६२ हजार रुपये दिले. गुगल-पे, फोन-पेद्वारे १  लाख ५३ हजार रुपये आणि  ५० हजार रुपये रोखीने दिले; पण कर्ज मंजूर झाले नाही.  यामुळे पाटील यांनी पैसे परत मागितले. शेवटी त्यांनी छावणी विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात  दि.७ आॅगस्टला  आणि वेदांतनगर ठाण्यातही  अर्ज दिला. 

विष प्राशन करून संपविले जीवनपाटील यांचा अर्ज हवालदार तडवी यांच्याकडे चौकशीसाठी होता.  पोलिसांनीही अर्जानुसार आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे पाटील यांनी सोमवारी (दि.१४) बाथरूममध्ये विष पिले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांचा निष्काळजीपणा; नातेवाईकांचा आरोप वेदांतनगर पोलिसांनी तडकाफडकी कारवाई केली असती तर पाटील आज जिवंत असते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या अर्जाबाबत निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप पाटील यांचे भाऊ विलास पाटील यांनी केला. 

मरण पावल्यावर पाठविली एमएलसीपाटील यांना घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती (एमएलसी) तातडीने पोलिसांना दिली नाही. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. यामुळे त्यांचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांना नोंदविता आला नाही. 

मृत्यूनंतर नोंदविला गुन्हा तक्रारदाराचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी संजय साबळे आणि प्रफुल्ल विरुद्ध मृताच्या मुलाची तक्रार नोंदवून घेत गुन्हा नोंदविला.