शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

औरंगाबादेत पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० कालबाह्य रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:31 IST

मुकुंदवाडी भागात वास्तव्यास असलेल्या औरंगाबाद पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडे तब्बल ५० कालबाह्य रिक्षा असल्याचे समजते.

ठळक मुद्देरिक्षांची मुदत संपलेली असताना ‘स्क्रॅप’ न करता काही व्यक्ती ‘बॉण्ड’वर या रिक्षा घेत आहेत. आरटीओ कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईतील एका रिक्षावरून हे उघडकीस आले.

- राजेश भिसे

औरंगाबाद : मुदत संपलेल्या व कुठलीही कागदपत्रे नसलेल्या रिक्षा अवघ्या दहा ते वीस हजार रुपयांमध्ये बॉण्डद्वारे खरेदी करून प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांवर आणल्या जात आहेत. मुकुंदवाडी भागात वास्तव्यास असलेल्या औरंगाबाद पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडे अशा तब्बल ५० कालबाह्य रिक्षा असल्याचे समजते. आरटीओ कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईतील एका रिक्षावरून हे उघडकीस आले.

कोणत्याही रिक्षाचे आयुर्मान हे शासन निर्णयानुसार कमाल २० वर्षे असते. त्यानंतर हे वाहन सार्वजनिक वापरासाठी योग्य नसते, तर रिक्षासाठी आरटीओ कार्यालयाचे परमिट लागते. नवीन परमिटसाठी दहा हजार रुपये शुल्क आकारले जाते; परंतु या परमिटचे ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करणे अनिवार्य असते. ते न केल्यास परमिट रद्द समजले जाते, तर रिक्षाचा विमा व फिटनेस सर्टिफिकेटशिवाय परमिट नूतनीकरण करता येत नाही. त्यामुळे सध्या असंख्य परमिट हे नूतनीकरणाअभावी रद्द झाले आहेत. मात्र, या परमिटच्या नावावर आयुर्मान संपुष्टात आलेल्या रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. या रिक्षांची मुदत संपलेली असताना ‘स्क्रॅप’ न करता काही व्यक्ती ‘बॉण्ड’वर या रिक्षा घेत आहेत. या रिक्षांतून प्रवाशांची वाहतूक केली जात असून, यात सामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शहरात आरटीओ कार्यालयातर्फे अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मोहीम सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत अशीच कालबाह्य रिक्षा (एमएच-२० एए-२६८०) आरटीओ कार्यालयात लावण्यात आली. या रिक्षाचे आयुर्मान संपले असून, परमिटही एका महिलेच्या नावावर असल्याचे आरटीओच्या संकेतस्थळावर दिसून आले. या रिक्षा वापराची मुदत २७ फेब्रुवारी २०१७ रोजी संपली आहे, तर याचा कर हा ३१ डिसेंबर १९९९ पर्यंतच भरण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा किती कालबाह्य रिक्षा शहरातील रस्त्यांवर धावतात, याची आकडेवारी आरटीओ कार्यालयाकडेही उपलब्ध नाही. 

आरटीओ कार्यालयाच्या दस्तावेजानुसार या रिक्षा कालबाह्य झालेल्या आहेत. मात्र, वाहनाची कागदपत्रे, विमा, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आदी कागदपत्रे नसतानाही या रिक्षा खुलेआमपणे रस्त्यांवर धावत आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याने जवळपास ५० कालबाह्य रिक्षा बॉण्डद्वारे खरेदी केल्या असल्याची चर्चा आरटीओ कार्यालय परिसरात सुरू आहे. जप्त केलेल्या रिक्षाच्या चालकाने ही माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. हा कर्मचारी कुठे कार्यरत आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरटीओच्या पथकाने याची सखोल चौकशी करण्याची गरज रिक्षाचालक व मालक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. 

कारवाई करण्याची गरजकालबाह्य रिक्षा रस्त्यावर आणून सामान्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आरटीओंनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. रिक्षांना क्यूआर कोड स्टीकर्स बसविण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी अशा रिक्षा शोधून त्यांच्या मालकांना दंड ठोठावून जरब बसवावी, तरच असे अवैध प्रकार बंद होतील.-निसार अहमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक मालक कृती समिती महासंघ, औरंगाबाद

प्रामाणिक रिक्षा चालकांचे नुकसानकालबाह्य रिक्षा रस्त्यांवर धावत असल्याने प्रवासी भाडे कमी आकारून वाहतूक केली जात आहे. सर्व कागदपत्रे, विमा, परमिट आदींसाठी खर्च करून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचे या चुकीच्या प्रकाराने नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया एका रिक्षाचालकाने दिली. 

तपासणी करण्यात येईल शहरात अवैध रिक्षांवरील कारवाईदरम्यान जप्त केलेल्या रिक्षांची कागदपत्रे अद्याप तपासण्यात आलेली नाहीत. ती तपासावी लागतील. त्यानंतरच याबाबत सविस्तरपणे सांगता येईल. - रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा