शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आॅनलाईन फसवणूक झालेल्या ३६ तक्रारदारांना पोलिसांनी मिळवून दिले पाच लाख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:42 IST

भामट्यांनी आॅनलाईन पळविलेली रक्कम परत मिळेलच याची खात्री नसते. मात्र सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३६ तक्रारदारांना त्यांचे पाच लाख रुपये परत मिळवून दिले.

औरंगाबाद : विविध प्रकारच्या थापा मारून सामान्यांकडून एटीएम कार्डची माहिती विचारून घेत त्यांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे पळविण्याच्या घटना सतत घडत असतात. आॅनलाईन फसवणुक ीचे वर्षभरात शंभरहून अधिक गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल होतात. भामट्यांनी आॅनलाईन पळविलेली रक्कम परत मिळेलच याची खात्री नसते. मात्र सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३६ तक्रारदारांना त्यांचे पाच लाख रुपये परत मिळवून दिले.

देशभरात विविध ठिकाणी बसलेले सायबर गुन्हेगार फोनद्वारे सामान्यांशी संपर्क साधून मी अमुक बँकेतून बोलतो. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले अथवा एटीएम कार्डची मुदत संपल्याने नूतनीकरण करण्यासाठी एटीएम कार्डची माहिती विचारून घेतात. फोन करणारा बँक अधिकारी असल्याचे समजून सामान्य नागरिक तो विचारील ती माहिती देन मोकळे होतात आणि अवघ्या काही सेकंदात बँक खात्यातील रक्कम आरोपी काढून घेतो.

यासोबतच ओटीपी क्रमांक विचारून आणि एटीएम कार्डची कोणतीही माहिती न विचारता, बँक खात्यातून पैसे पळविण्याच्या घटना घडत आहेत. सायबर गुन्हेगार विविध प्रकारच्या इंटरनेटच्या लिंक, अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर पाठवून ते ओपन करायला सांगतात. जे लोक अशा प्रकारच्या अनोळखी लिंक ओपन करतात, त्यांच्या खात्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने गुन्हेगार मिळवितात आणि ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतात. अशा प्रकारच्या सुमारे शंभरहून अधिक तक्रारी पोलिसांकडे येतात.

सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. जानेवारी महिन्यात प्राप्त तक्रारींपैकी ११ तक्रारदारांना १ लाख ८८ हजार रुपये, फेब्रुवारीत १५ जणांना १ लाख २१ हजार ९६ रुपये तर मार्च महिन्यात १० तक्रारदारांना १ लाख ८८ हजार ६३९ रुपये परत मिळवून दिले. पोलीस कर्मचारी विवेक औटी, रवी खरात, रेवणनाथ गवळी, सुदर्शन एखंडे, प्रशांत साकला आणि सुशांत शेळके यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्कम मिळवून दिल्याचे सहायक निरीक्षक डॉ. राहुल खटावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद