शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यास पोलीस अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 20:11 IST

काही गुन्हे सशर्त परत घेण्यास पोलीस प्रशासनाने हिरवा कंदिल असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

ठळक मुद्दे शासनाने औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून याविषयी अभिप्राय मागवला होता. दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीचे गुन्हे परत घेऊ नका,असेही अहवालात नमूद आहे. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर नोंद झालेले काही गुन्हे सशर्त परत घेण्यास पोलीस प्रशासनाने हिरवा कंदिल असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. आंदोलनादरम्यान पोलिसांवरील हल्ले आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीचे गुन्हे परत घेऊ नका,असेही अहवालात नमूद आहे. 

मराठा आंदोलन आणि कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी पोलिसांनी नोंदविलेले गुन्हे परत घ्यावे,अशी मागणी आंदोलकांकडून शासनाकडे करण्यात आली. त्यानंतर शासनाने औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून याविषयी अभिप्राय मागवला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी शासनास अहवाल नुकताच सादर केला. ज्या आंदोलकांनी दहा लाखांपर्यंतच्या खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले आहे. त्यांच्याकडून नुकसानभरपाई घ्यावी आणि नंतरच त्यांचे गुन्हे परत घ्यावे. सरकारी अधिकारी, कर्मचाºयांना झालेली मारहाण आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीप्रकरणी दाखल गुन्हे परत घेऊ नये, अशी शिफारस अहवालात केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारCrime Newsगुन्हेगारी