शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पोलिसांची ५३० रिक्षांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: June 24, 2014 01:08 IST

औरंगाबाद : शहरात टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध वाहतूक पोलीस शाखेने धडक कारवाई सुरू केली

औरंगाबाद : शहरात टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध वाहतूक पोलीस शाखेने धडक कारवाई सुरू केली असून, आठ दिवसांत ५३० रिक्षांचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. दरम्यान, यातील काही रिक्षा पोलिसांनी जप्त करून आयुक्तालयातील मैदानावर उभ्या केलेल्या आहेत.पोलिसांच्या या धडक कारवाईच्या निषेधार्थ रिक्षा मालक व चालकांनी दंड थोपटले असून, बुधवारी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील रिक्षा वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजित बोऱ्हाडे म्हणाले की, आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार केवळ टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. खंडपीठाने पोलीस व आरटीओला आदेश दिले आहेत की, टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध काय कारवाई केली ते ३० जून रोजी न्यायालयात प्रत्यक्ष येऊन सांगावे. त्यानुसार १६ जूनपासून टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ५३० टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध दंडात्मक कारवाई केलेली आहे. टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना कमीत कमी ३०० व जास्तीत जास्त ६०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.रिक्षा किंवा टॅक्सीला करार पद्धत परवडत नसल्यामुळे शासनाने त्यांना शेअर पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यास अनुमती दिली. मात्र, आपल्याकडे शेअर पद्धतीमध्येही टप्पा पद्धत अवलंबून सर्रासपणे प्रवासी वाहतूक केली जाते. एका ठिकाणाहून तीन प्रवासी रिक्षात बसवून ती रिक्षा मध्ये कुठेही उभी न करता अथवा मध्येच प्रवासी उतरवून दुसरे प्रवासी न बसवता थेट ठरलेल्या ठिकाणीच प्रवाशांना सोडणे. यासाठी ३३ टक्के जादा भाडे वसूल करण्याची मुभा आहे. ते भाडे तीन प्रवाशांनी मिळून रिक्षाचालकास द्यायचे. मात्र, याही पद्धतीने शहरात प्रवासी वाहतूक केली जात नाही.रिक्षाचा चालकांचा बुधवारी बंदपोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षा मालक व चालकांनी बुधवारी पहाटे ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद पुकारला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना रिक्षाचालक-मालक संयुक्त संघर्ष समितीने मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, रिक्षाचालकांजवळ कागदपत्रे असतानादेखील पोलीस मनमानीपणे त्यांना दंड आकारत आहेत. टप्पा वाहतुकीचा परवाना कोणालामहाराष्ट्रात केवळ एस. टी. बसलाच शासनाने टप्पा वाहतुकीचा परवाना दिलेला आहे. टॅक्सी, काळी-पिवळी, आॅटोरिक्षा व अन्य वाहनांसाठी करार पद्धतीच्या प्रवासी वाहतुकीला परवाना दिला जातो; पण काळी-पिवळी, रिक्षा हे टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतुकीला पसंती देतात. त्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस व आरटीओंनी विरोध केलेला आहे.