शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

गुंडगिरी रोखण्यास पोलीस सक्षम; सामाजिक विषयांवर नागरिकांनो पुढे या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:29 IST

दामिनी पथकाची पुनर्रचना; महाविद्यालयांत गस्त वाढविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत

औरंगाबाद : शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. गुंडांना रोखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. मागील महिन्यात झालेल्या विविध खुनांच्या घटनेतील आरोपी व मृत हे एकमेकांच्या ओळखीचे होते. प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह आणि मित्रांमधील दुराव्यामुळे त्या घटना घडल्या. आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. ही गुंडगिरीची समस्या नसून, सामाजिक समस्या आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पालकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.

पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, शाळा-महाविद्यालयांत आपली मुले काय करतात, याकडे पालकांचे लक्ष असले पाहिजे. आपल्या मुलामुलींचे मित्र कोण, ते कोणाशी बोलतात, मुलगा नशा तर करीत नाही ना, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. निरीक्षक गीता बागवडे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा अनेक मुले-मुली क्लास सोडून एकत्र बसलेले आढळून आले. मुलांच्या पालकांनी आपले पाल्य क्लासेसलाच जातात की कोठे, याकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस शक्य होईल, तेवढे काम करीत आहेत. मात्र, या प्रकारांना अधिक व्यापक प्रमाणात आळा घालण्यासाठी पालक, शिक्षक, मित्र, शेजाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहर पोलीस अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधत आहेत. नशेखोरीवर जनजागृती करीत आहेत. पण, हे प्रयत्न अपुरे आहेत. त्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना मदत केली पाहिजे.

आता दामिनीची दोन पथकेमहाविद्यालयांसह निर्जनस्थळी गस्त वाढविण्यासाठी दामिनीच दोन पथके राहतील. एक पथक कार्यरत असून दुसरे पथक स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक तक्रारपेटी ठेवली जाईल. ही पेटी दामिनी पथकाच्या उपस्थितीत उघडली जाईल. त्याशिवाय गांजा, चरस, अफूसह इतर अमली पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठीही एक पथक स्थापन केले आहे. ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये संबंधित पोलीस गस्त घालतील.

४३ दिवस उपचार केलेनशेच्या आहारी गेलेल्या एका युवकावर पोलिसांनी शहरातील दवाखान्यात तब्बल ४३ दिवस उपचार केले. तो आता नशामुक्त झाला आहे. पुढील आठवड्यात पोलीस शहरातील नागरिकांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये त्या मुलाला बाेलावण्याचा विचार सुरू आहे. पोलीस सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला नागरिकांची साथ मिळणे गरजेचे असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस