शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी रोखण्यास पोलीस सक्षम; सामाजिक विषयांवर नागरिकांनो पुढे या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:29 IST

दामिनी पथकाची पुनर्रचना; महाविद्यालयांत गस्त वाढविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत

औरंगाबाद : शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. गुंडांना रोखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. मागील महिन्यात झालेल्या विविध खुनांच्या घटनेतील आरोपी व मृत हे एकमेकांच्या ओळखीचे होते. प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह आणि मित्रांमधील दुराव्यामुळे त्या घटना घडल्या. आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. ही गुंडगिरीची समस्या नसून, सामाजिक समस्या आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पालकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.

पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, शाळा-महाविद्यालयांत आपली मुले काय करतात, याकडे पालकांचे लक्ष असले पाहिजे. आपल्या मुलामुलींचे मित्र कोण, ते कोणाशी बोलतात, मुलगा नशा तर करीत नाही ना, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. निरीक्षक गीता बागवडे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा अनेक मुले-मुली क्लास सोडून एकत्र बसलेले आढळून आले. मुलांच्या पालकांनी आपले पाल्य क्लासेसलाच जातात की कोठे, याकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस शक्य होईल, तेवढे काम करीत आहेत. मात्र, या प्रकारांना अधिक व्यापक प्रमाणात आळा घालण्यासाठी पालक, शिक्षक, मित्र, शेजाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहर पोलीस अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधत आहेत. नशेखोरीवर जनजागृती करीत आहेत. पण, हे प्रयत्न अपुरे आहेत. त्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना मदत केली पाहिजे.

आता दामिनीची दोन पथकेमहाविद्यालयांसह निर्जनस्थळी गस्त वाढविण्यासाठी दामिनीच दोन पथके राहतील. एक पथक कार्यरत असून दुसरे पथक स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक तक्रारपेटी ठेवली जाईल. ही पेटी दामिनी पथकाच्या उपस्थितीत उघडली जाईल. त्याशिवाय गांजा, चरस, अफूसह इतर अमली पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठीही एक पथक स्थापन केले आहे. ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये संबंधित पोलीस गस्त घालतील.

४३ दिवस उपचार केलेनशेच्या आहारी गेलेल्या एका युवकावर पोलिसांनी शहरातील दवाखान्यात तब्बल ४३ दिवस उपचार केले. तो आता नशामुक्त झाला आहे. पुढील आठवड्यात पोलीस शहरातील नागरिकांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये त्या मुलाला बाेलावण्याचा विचार सुरू आहे. पोलीस सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला नागरिकांची साथ मिळणे गरजेचे असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस