शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा हात; किती सरपंच, कारागिरांची नोंदणी?

By साहेबराव हिवराळे | Updated: January 4, 2024 19:04 IST

खेड्यात विविध कलागुणांना व्यावसायिक दर्जा मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक कौशल्य असलेल्या ग्रामीण कारागिरांना व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी सरपंचांनीदेखील नोंदणी करणे आवश्यक असून, त्यांची मंजुरी आवश्यक आहे. जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक कारागिरांनी व सरपंचांनी नोंदणी सुरू केलेली आहे.

काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लोकांना ५ टक्के सवलतीच्या दराने ३ लाख रुपयांची रक्कम सरकारकडून दिली जाईल. पहिल्या टप्प्यात पात्र व्यक्तींना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांची तरतूद आहे.

दहा हजार कारागिरांची नोंदणीजिल्हाभरात १० हजारांपेक्षाही कारागिरांची नोंदणी करण्यात आली आहे. १८ सेक्टरमध्ये काम करणारे लोक याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये गवंडी, नाभिक, माळी, धोबी, शिंपी, लॉकस्मिथ, सुतार, लोहार, सोनार, चिलखती, शिल्पकार, चपला - बूट बनविणारे, बास्केट/चटई/झाडू बनविणारे, बाहुली आणि खेळणी बनविणारे, हातोडा आणि टूलकिट तयार करणारे, उत्पादक, फिशिंग नेट उत्पादक याचा लाभ घेऊ शकतात.

ही कागदपत्रे आवश्यकया योजनेचा लाभ घेण्यासाठी चॉईस सेंटरद्वारे पीएम विश्वकर्मा योजना पोर्टलवर नोंदणी करू शकतात. यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, बँक तपशील आणि रेशन कार्ड आवश्यक असेल.

सरपंचांची नोंदणी आवश्यकया योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. स्वयंरोजगार/व्यवसाय विकास योजनेंतर्गत गेल्या ५ वर्षांत कोणत्याही सरकारी योजनेंतर्गत कर्ज घेतलेले नसावे. कुटुंबातील एकच सदस्य या योजनेंतर्गत पात्र असेल. सरकारी सेवेत कार्यरत व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. शहरी कारागिरांना राज्यातील प्रत्येक जिल्हा व्यापार व उद्योग केंद्राशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. ग्रामीण नागरिकांनी सरपंचांशी संपर्क साधावा.

स्थानिक पातळीवर उद्योजकांना वाव मिळावा...खेड्यात विविध कलागुणांना व्यावसायिक दर्जा मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्याचा स्थानिक व्यवसायिकांनी लाभ घ्यावा व कुटुंबाचा स्तर आर्थिकदृष्ट्या उंचावण्यावर भर देण्याची गरज आहे.- जिल्हा व्यवस्थापक, आपले सरकार

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादprime ministerपंतप्रधान