शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा हात; किती सरपंच, कारागिरांची नोंदणी?

By साहेबराव हिवराळे | Updated: January 4, 2024 19:04 IST

खेड्यात विविध कलागुणांना व्यावसायिक दर्जा मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक कौशल्य असलेल्या ग्रामीण कारागिरांना व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी सरपंचांनीदेखील नोंदणी करणे आवश्यक असून, त्यांची मंजुरी आवश्यक आहे. जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक कारागिरांनी व सरपंचांनी नोंदणी सुरू केलेली आहे.

काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लोकांना ५ टक्के सवलतीच्या दराने ३ लाख रुपयांची रक्कम सरकारकडून दिली जाईल. पहिल्या टप्प्यात पात्र व्यक्तींना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांची तरतूद आहे.

दहा हजार कारागिरांची नोंदणीजिल्हाभरात १० हजारांपेक्षाही कारागिरांची नोंदणी करण्यात आली आहे. १८ सेक्टरमध्ये काम करणारे लोक याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये गवंडी, नाभिक, माळी, धोबी, शिंपी, लॉकस्मिथ, सुतार, लोहार, सोनार, चिलखती, शिल्पकार, चपला - बूट बनविणारे, बास्केट/चटई/झाडू बनविणारे, बाहुली आणि खेळणी बनविणारे, हातोडा आणि टूलकिट तयार करणारे, उत्पादक, फिशिंग नेट उत्पादक याचा लाभ घेऊ शकतात.

ही कागदपत्रे आवश्यकया योजनेचा लाभ घेण्यासाठी चॉईस सेंटरद्वारे पीएम विश्वकर्मा योजना पोर्टलवर नोंदणी करू शकतात. यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, बँक तपशील आणि रेशन कार्ड आवश्यक असेल.

सरपंचांची नोंदणी आवश्यकया योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. स्वयंरोजगार/व्यवसाय विकास योजनेंतर्गत गेल्या ५ वर्षांत कोणत्याही सरकारी योजनेंतर्गत कर्ज घेतलेले नसावे. कुटुंबातील एकच सदस्य या योजनेंतर्गत पात्र असेल. सरकारी सेवेत कार्यरत व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. शहरी कारागिरांना राज्यातील प्रत्येक जिल्हा व्यापार व उद्योग केंद्राशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. ग्रामीण नागरिकांनी सरपंचांशी संपर्क साधावा.

स्थानिक पातळीवर उद्योजकांना वाव मिळावा...खेड्यात विविध कलागुणांना व्यावसायिक दर्जा मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्याचा स्थानिक व्यवसायिकांनी लाभ घ्यावा व कुटुंबाचा स्तर आर्थिकदृष्ट्या उंचावण्यावर भर देण्याची गरज आहे.- जिल्हा व्यवस्थापक, आपले सरकार

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादprime ministerपंतप्रधान