शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

सुखद ! मुंबईनंतर औरंगाबादेत महापालिकेच्या सीबीएसई शाळा; आठच दिवसात प्रवेश फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:34 IST

Admission to Aurangabad Municipal Corporation's CBSE schools is full :१५ ऑगस्टला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन उद्‌घाटन

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सुरुप्रत्येक वर्गात केवळ २० विद्यार्थी आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश पूर्ण

औरंगाबाद : शहरातील गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा (CBSE School ) सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला आहे. उस्मानपुरा आणि गारखेडा येेथील शाळेत सीबीएसईच्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. या शाळांचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांच्या हस्ते होणार आहे. ( Municipal CBSE schools in Aurangabad after Mumbai; Admission full in eight days)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या शाळा सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सीबीएसईच्या मान्यतेने सुरू केल्या जाणार आहेत. तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध असून, सीबीएसईचे वर्ग सुरू करताच पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी गर्दी केली. आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे.

हेही वाचा - हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

प्रत्येक वर्गात २० मुलांना प्रवेशजुलैअखेरीस दोन्ही शाळांमध्ये सीबीएसईचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रत्येक वर्गात ५० मुलांची प्रतीक्षा यादी आहे. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

कोण शिकविणार विद्यार्थ्यांनापालिकेतील शिक्षकांमधूनच २५ ते ३० शिक्षक सीबीएसईचे वर्ग घेण्यासाठी निवडण्यात आले आहेत. हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या दोन्ही शाळांत सीबीएसई वर्ग योग्य प्रकारे चालविण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.

सीबीएसई शाळांचे १५ ऑगस्टला उद्‌घाटनमुंबई महापालिकेनंतर राज्यात औरंगाबाद महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उस्मानपुरा आणि गारखेडा येथील शाळांमध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रवेश फुल्ल झाले आहेत. या शाळांचे उद्‌घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSchoolशाळा