शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! मुंबईनंतर औरंगाबादेत महापालिकेच्या सीबीएसई शाळा; आठच दिवसात प्रवेश फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:34 IST

Admission to Aurangabad Municipal Corporation's CBSE schools is full :१५ ऑगस्टला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन उद्‌घाटन

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सुरुप्रत्येक वर्गात केवळ २० विद्यार्थी आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश पूर्ण

औरंगाबाद : शहरातील गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा (CBSE School ) सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला आहे. उस्मानपुरा आणि गारखेडा येेथील शाळेत सीबीएसईच्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. या शाळांचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांच्या हस्ते होणार आहे. ( Municipal CBSE schools in Aurangabad after Mumbai; Admission full in eight days)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या शाळा सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दोन शाळा सीबीएसईच्या मान्यतेने सुरू केल्या जाणार आहेत. तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध असून, सीबीएसईचे वर्ग सुरू करताच पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी गर्दी केली. आठ दिवसांतच शाळेतील प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे.

हेही वाचा - हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

प्रत्येक वर्गात २० मुलांना प्रवेशजुलैअखेरीस दोन्ही शाळांमध्ये सीबीएसईचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरी वर्गासाठी प्रत्येकी २० प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रत्येक वर्गात ५० मुलांची प्रतीक्षा यादी आहे. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

कोण शिकविणार विद्यार्थ्यांनापालिकेतील शिक्षकांमधूनच २५ ते ३० शिक्षक सीबीएसईचे वर्ग घेण्यासाठी निवडण्यात आले आहेत. हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या दोन्ही शाळांत सीबीएसई वर्ग योग्य प्रकारे चालविण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.

सीबीएसई शाळांचे १५ ऑगस्टला उद्‌घाटनमुंबई महापालिकेनंतर राज्यात औरंगाबाद महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उस्मानपुरा आणि गारखेडा येथील शाळांमध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी प्रवेश फुल्ल झाले आहेत. या शाळांचे उद्‌घाटन १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSchoolशाळा