शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

लावला कापूस अन् विमा उतरवला मोसंबी, डाळिंबाचा; तब्बल ४ हजार शेतकऱ्यांचा कारनामा उघड

By बापू सोळुंके | Updated: October 31, 2024 18:44 IST

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना फळ पीकविमा काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरचा शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याचे समोर आले. यानंतर कृषी विभागाने नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबविली. यात कपाशी लावलेल्या शेताला शेतकऱ्यांनी मोसंबी, डाळिंबाची बाग दाखवून विमा उतरविल्याचे आढळून आले. अशा प्रकारे बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ४ हजार २३ आहे.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. तर डाळिंब, चिकू, पेरूच्या बागाही शेतकऱ्यांनी जोपासल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी १३ हजार २८३ शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा उतरविल्याची माहिती विमा कंपनीकडून कृषी विभागाला प्राप्त झाली होती. कृषी विभागाकडे असलेल्या नोंदीपेक्षा ८०५ हेक्टर क्षेत्र अधिक असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ हजार २८३ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन २० ते २८ ऑक्टोबर दरम्यान फळबागांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. तेव्हा शेतकऱ्यांनी मोसंबीची बाग असल्याचे दाखवून ज्या क्षेत्राचा विमा उतरविला, त्या शेतात कापसाचे पीक असल्याचे दिसून आले. तर एका शेतकऱ्याने चक्क जनावरांसाठी टाकलेल्या गजराज गवताच्या जमिनीवर डाळिंबाची बाग दाखवित विमा काढल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शिवाय अन्य शेतकऱ्यांनीही अशीच बोगसगिरी करीत फळबाग लावली नसताना पीक विमा काढल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले. अशा एकूण ४ हजार २३ शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.

अडीच हजार शेतकऱ्यांनी काढला जादा क्षेत्राचा विमाजिल्ह्यातील २ हजार ५२५ शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. मात्र त्यांनी विमा उतरविताना त्यांच्याकडे असलेल्या फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर बाग असल्याचे दाखवले आहे.

दोन तालुक्यात बोगसगिरी अधिकफळबाग नसताना शेतात बाग असल्याचे कागदोपत्री दाखवून विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक ८८३ शेतकरी पैठण तालुक्यातील आहेत. तर ५५२ शेतकरी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी