शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

लावला कापूस अन् विमा उतरवला मोसंबी, डाळिंबाचा; तब्बल ४ हजार शेतकऱ्यांचा कारनामा उघड

By बापू सोळुंके | Updated: October 31, 2024 18:44 IST

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना फळ पीकविमा काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरचा शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याचे समोर आले. यानंतर कृषी विभागाने नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबविली. यात कपाशी लावलेल्या शेताला शेतकऱ्यांनी मोसंबी, डाळिंबाची बाग दाखवून विमा उतरविल्याचे आढळून आले. अशा प्रकारे बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ४ हजार २३ आहे.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. तर डाळिंब, चिकू, पेरूच्या बागाही शेतकऱ्यांनी जोपासल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी १३ हजार २८३ शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा उतरविल्याची माहिती विमा कंपनीकडून कृषी विभागाला प्राप्त झाली होती. कृषी विभागाकडे असलेल्या नोंदीपेक्षा ८०५ हेक्टर क्षेत्र अधिक असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ हजार २८३ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन २० ते २८ ऑक्टोबर दरम्यान फळबागांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. तेव्हा शेतकऱ्यांनी मोसंबीची बाग असल्याचे दाखवून ज्या क्षेत्राचा विमा उतरविला, त्या शेतात कापसाचे पीक असल्याचे दिसून आले. तर एका शेतकऱ्याने चक्क जनावरांसाठी टाकलेल्या गजराज गवताच्या जमिनीवर डाळिंबाची बाग दाखवित विमा काढल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शिवाय अन्य शेतकऱ्यांनीही अशीच बोगसगिरी करीत फळबाग लावली नसताना पीक विमा काढल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले. अशा एकूण ४ हजार २३ शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.

अडीच हजार शेतकऱ्यांनी काढला जादा क्षेत्राचा विमाजिल्ह्यातील २ हजार ५२५ शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. मात्र त्यांनी विमा उतरविताना त्यांच्याकडे असलेल्या फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर बाग असल्याचे दाखवले आहे.

दोन तालुक्यात बोगसगिरी अधिकफळबाग नसताना शेतात बाग असल्याचे कागदोपत्री दाखवून विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक ८८३ शेतकरी पैठण तालुक्यातील आहेत. तर ५५२ शेतकरी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी