शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण नावालाच..

By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST

विलास चव्हाण, परभणी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात गावामध्ये वृक्षलागवड करण्यात येते़ यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़

विलास चव्हाण, परभणी
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात गावामध्ये वृक्षलागवड करण्यात येते़ यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ परंतु, शासकीय अधिकारी कागदोपत्रीच वृक्षलागवड दाखवून लाखोंचा मलिदा लाटत आहेत़ यामुळे पर्यावरणाचे संर्वधन होण्याऐवजी ऱ्हास होत आहे़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़
शासन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत़ परंतु, राज्यासह जिल्ह्यत वनाचे क्षेत्र वाढणे अपेक्षित होते़ परंतु, शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे वनाचे क्षेत्र एक टक्काही वाढले नाही़ अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये कागदोपत्रीच खर्च होत आहेत़ त्यातच वृक्षाची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वनाचे क्षेत्र आणखीन कमी होऊ लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे़
यामुळे निसर्गाचा असमतोल निर्माण होत असल्याने तापमानात वाढ होत आहे़ तसेच पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे़ परभणी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६ हजार ५११ चौ़किमी एवढे आहे़ यापैकी १०१़७९ चौ़किमी वनक्षेत्र म्हणजे १़६० टक्के एवढे आहे़ वनक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून दरवर्षी वन विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो़ परंतु, वृक्ष लागवडीसाठी निधी खर्च केल्यानंतरही जिल्ह्यातील वनाचे क्षेत्र मात्र वाढत नसल्याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे़
रस्त्याच्या दुतर्फा झाडे गेली कुठे ?
वनविभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा लाखो झाडे लावली जातात़ परंतु, जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा झाडेच दिसत नाहीत़ लावलेली झाडे गेली कुठे ? हा गहन प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे़ लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे किती टक्के जिवंत राहतात हा संशोधनाचा विषय ठरेल़
शतकोटी योजना बासनात
गतवर्षी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून शतकोटी योजना राबविण्यात आली़ या योजनेतंर्गत शाळा, महाविद्यालय, शेतावरील बाध, प्रशासकीय कार्यालयाचा परिसर, गाव व शहरातील घरासमोर वृक्षलागवड करण्यात आली़ परंतु, प्रत्यक्षात वृक्षलागवड न करता कागदोपत्री करून कोट्यवधीं रुपये अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाटल्याने ही चांगली योजना बासणात बांधण्याची वेळ शासनावर आली आहे़ या योजनेची अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर नक्कीच जिल्ह्यात झाडांची संख्या वाढली असती़ परंतु, मनपाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
सरार्सपणे वृक्षतोड
परभणी जिल्ह्यात केवळ १़६० टक्के वनाचे क्षेत्र आहे़ वन विभागाने या वनाचे रक्षण करणे गरजे आहे़ परंतु, वृक्षांची जिल्ह्यात सरार्सपणे तोड केली जात असल्यामुळे वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे़ शहरासह ग्रामीण भागातील अवैध लाकुड कटई मशीनकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़