शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

जालना अन् चिकलठाण्यातही पीटलाइन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा राजकारण शमविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 13:28 IST

चिकलठाणा येथे पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

औरंगाबाद : औरंगाबादेतील चिकलठाणा येथील पीटलाइन जालन्याला पळविण्यात येत असल्याची ओरड होत असताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा दिला. या दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी औरंगाबादेतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिली. दोन्ही जिल्ह्यांना पीटलाइनचा शब्द देऊन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी पीटलाइनवरून सुरू असलेले राजकारण शमविण्याचा प्रयत्न केला.

उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, विवेक देशपांडे, डाॅ. फडके आणि भाजपच्या विजया रहाटकर यांनी बुधवारी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांविषयी संवाद साधला. यावेळी पीटलाइनसह औरंगाबाद-नगर रेल्वे मार्ग, जालना-जळगाव रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव मार्ग आदींवर चर्चा झाली. उद्योजकांना नजरेसमोर ठेवून औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाइन करण्याची मागणी करण्याचा पवित्रा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतला. त्यापाठोपाठ चिकलठाण्यातच पीटलाइन व्हावी, या मागणीसाठी चिकलठाणा येथील ग्रामस्थही पुढे आले.

रेल्वे प्रश्नांवर संवादविविध रेल्वेप्रश्नांवर संवाद साधला. चिकलठाणा आणि जालना या दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरु आहे. उद्योजकांच्या सुविधेच्या दृष्टीने हा मार्गही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.- राम भोगले, उद्योजक

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादJalanaजालना