शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक अधिकारा विरोधात खंडपीठात याचिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:40 IST

महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक अधिकार काढून घेण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड. अनिता देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार

औरंगाबाद : महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक अधिकार काढून घेण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड. अनिता देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

बेकायदेशीररीत्या जमिनीच्या मालकीत फेरफार करून सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना जेरीस आणणारे अधिकारी वारंवार चुका करतात, तरीही त्यांना शासनाकडून काहीही शिक्षा होत नाही. सामान्यांना तलाठ्यांपासून विभागीय आयुक्तालयांपर्यंत हेलपाटे मारावे लागतात. जमीन महसूल अधिनियमांची पायमल्ली करून मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एकतर कायद्याची पदवी अभ्यासक्र म बंधनकारक करावा अथवा त्यांचे अर्धन्यायिक अधिकार काढून घेण्यात यावेत, असेही अ‍ॅड. देशमुख म्हणाल्या.

१९९९ पासून अ‍ॅड. देशमुख यांच्या चाळीसगाव येथील शेतजमीन सर्व्हे क्र.२१, २३, २४ मधील मालकीच्या हक्काच्या नोंदी बेकायदेशीर घेण्यात आल्या. याप्रकरणी अ‍ॅड. देशमुख मागील १८ वर्षांपासून लढा देत आहेत. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान याप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या अहवालावरून आयुक्तांनी तहसीलदार जी.आर. दांडगे, तलाठी आर.बी. ओहळ, मंडळ अधिकारी आर.के. शेख, तहसीलदार व्ही.एस. अहिरे, मंगरुळे, पी.के. धर्माधिकारी यांच्याविरुद्ध दंडनिहाय कारवाई आदेश दिले.

पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या तरीही या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. राजकीय दबावाखाली महसूल अधिकारी पाहिजे, त्या पद्धतीने फेरफार करतात, त्याचा भुर्दंड सामान्यांना सोसावा लागतो, असा आरोपही त्यांनी केला. साध्या अर्जावर महसूल अधिकारी फेरफार करण्याचे आदेश देऊन मोकळे होतात. तलाठी, मंडळ अधिकारीही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फोनवर अथवा तोंडी आदेशावरून फेरफारीच्या नोंदी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यभरात अनेक प्रकरणेराज्यभरात फेरफार, बेकायदेशीर वारसांच्या नोंदी घेऊन सातबारा तयार होत आहेत. अर्धन्यायिक अधिकार असलेल्या यंत्रणेवर दबाव आणून हा प्रकार होतो आहे. त्यामुळे ग्राहक मंच, कौटुंबिक न्यायालयांप्रमाणे जमिनींच्या तक्रारींबाबत स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे, महसूल अधिकाऱ्यांचे या प्रकरणात अधिकार काढून घेण्यात यावेत. विधि आयोगासमोर हे प्रकरण मध्यंतरी आले होते. तसेच मद्रास हायकोर्टासमोरदेखील असे प्रकरण आहे; परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मराठवाड्यातही फेरफार आणि मालकी हक्कातील वादाच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत जनरेटा जोपर्यंत निर्माण होत नाही, महसूल अधिकाऱ्यांकडून त्रास होत असलेले नागरिक जोपर्यंत रस्त्यावर येत नाहीत, तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठRevenue Departmentमहसूल विभागCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद