शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कोल्ही ग्रामस्थांची वज्रमूठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:37 IST

तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला. येथील कामात भारतीय जैन संघटनाही सहभागी झाली आहे. वैजापूर तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली असून अनेक गावात या संघटनेकडून मदत करण्यात येत आहे.भविष्यात दुष्काळामुळे शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रविवारी कोल्ही येथील ग्रामस्थांनीदेखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.तालुक्यात दुष्काळामुळे गेल्या चार वर्षात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. मात्र, पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावकºयांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केला आहे. यासाठी गावकरी रात्रीचा दिवस करून श्रमदानाचे काम करत आहेत. या स्पर्धेने गावकºयांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाºया स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकविण्याचा विश्वास कोल्ही गावातील तरुण पिढीने व्यक्त केला. वैजापूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गेल्या चार ते पाच वर्षात सातत्याने वाढतच चाललेली आहे. वैजापूरमध्ये या वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रवीण पारख, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नीलेशकुमार पारख, वैजापूर तालुकाध्यक्ष विशाल संचेती, सुधाकर पवार, राजेश संचेती, महेश हिरण, दीपक सारडा, गौतम संचेती, संजय मालपाणी, प्रफुल्ल संचेती, परेश संचेती, सागर संचेती, दीपक संचेती, सचिन बाफना, प्रवीण संचेती, संजय भन्साळी, डॉ. बोरा, प्रल्हाद अरसूळ, दिनेश सोनवणे, अंबादास लांडगे, साई, रवी या जैन संघटनेचे हातही श्रमदानाला लागल्यामुळे गावकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे.दरम्यान, भर उन्हात रविवारी हजारो नागरिक या गावात उत्साहाने सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा उत्साहही वाढला आहे.गावातील लोक त्यांच्या त्यांच्या गावामध्ये भरपूर श्रमदान करणार आहेत. तरी सुध्दा श्रमदानानंतरही काही कठीण काम गावकºयांना श्रमदानाने करता येणे शक्य नाही. कारण प्रत्येक गावात माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करावे लागते.तसेच विशिष्ट काम श्रमदानाने केल्यानंतर खडकात करावे लागणारे काम श्रमदानाने होऊ शकत नाही, असा ‘बीजेएस’चा अनुभव आहे. त्यामुळे ‘बीजेएस’ने यंत्रसामुग्री पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या ज्या गावांची मशीनमध्ये डिझेल भरण्याची तयारी असेल अशा गावांना जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे काम करुन दिले जाणार आहे, असे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती यांनी सांगितले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपात