शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कोल्ही ग्रामस्थांची वज्रमूठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:37 IST

तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला. येथील कामात भारतीय जैन संघटनाही सहभागी झाली आहे. वैजापूर तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली असून अनेक गावात या संघटनेकडून मदत करण्यात येत आहे.भविष्यात दुष्काळामुळे शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रविवारी कोल्ही येथील ग्रामस्थांनीदेखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.तालुक्यात दुष्काळामुळे गेल्या चार वर्षात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. मात्र, पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावकºयांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केला आहे. यासाठी गावकरी रात्रीचा दिवस करून श्रमदानाचे काम करत आहेत. या स्पर्धेने गावकºयांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाºया स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकविण्याचा विश्वास कोल्ही गावातील तरुण पिढीने व्यक्त केला. वैजापूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गेल्या चार ते पाच वर्षात सातत्याने वाढतच चाललेली आहे. वैजापूरमध्ये या वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रवीण पारख, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नीलेशकुमार पारख, वैजापूर तालुकाध्यक्ष विशाल संचेती, सुधाकर पवार, राजेश संचेती, महेश हिरण, दीपक सारडा, गौतम संचेती, संजय मालपाणी, प्रफुल्ल संचेती, परेश संचेती, सागर संचेती, दीपक संचेती, सचिन बाफना, प्रवीण संचेती, संजय भन्साळी, डॉ. बोरा, प्रल्हाद अरसूळ, दिनेश सोनवणे, अंबादास लांडगे, साई, रवी या जैन संघटनेचे हातही श्रमदानाला लागल्यामुळे गावकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे.दरम्यान, भर उन्हात रविवारी हजारो नागरिक या गावात उत्साहाने सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा उत्साहही वाढला आहे.गावातील लोक त्यांच्या त्यांच्या गावामध्ये भरपूर श्रमदान करणार आहेत. तरी सुध्दा श्रमदानानंतरही काही कठीण काम गावकºयांना श्रमदानाने करता येणे शक्य नाही. कारण प्रत्येक गावात माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करावे लागते.तसेच विशिष्ट काम श्रमदानाने केल्यानंतर खडकात करावे लागणारे काम श्रमदानाने होऊ शकत नाही, असा ‘बीजेएस’चा अनुभव आहे. त्यामुळे ‘बीजेएस’ने यंत्रसामुग्री पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या ज्या गावांची मशीनमध्ये डिझेल भरण्याची तयारी असेल अशा गावांना जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे काम करुन दिले जाणार आहे, असे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती यांनी सांगितले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपात