शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

पाण्यासोबतच टँकरची टंचाई; कन्नड तालुक्यात मंजुरी मिळूनही ग्रामस्थांच्या नशिबी प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:17 IST

टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

कन्नड (औरंगाबाद ) : उष्णतेचा पारा ४४ अंशांवर पोहोचला असताना कन्नड तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे येथील बहुतांश गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक गावांत पाण्याचे टँकर मंंजूरही झाले आहेत. मात्र, तरीही टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने दखल घेऊन त्वरित टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

कन्नड तालुक्यात वाढणाऱ्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी, विहिरींनी तळ गाठला असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये म्हणून प्रशासनही पाहणी करून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशही देत आहेत. मात्र, टँकर पुरवठादाराकडून टँकर पुरविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत असून पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ नागरिकांसह महिलांवर आली आहे.

तालुक्यातील आठेगाव, शिवराई, दिगाव, शेलगाव, दहिगाव, आडगाव (पि.), मोहरा, आमदाबाद मोहाडी, सासेगाव, बरकतपूर, रायगाव, रुईखेडा, जवळी खुर्द व जवळी बु., कानडगाव (क.), देवळी, गणेशपूर, पिंपरखेडा ग्रामपंचायतींतर्गत पिंपळवाडी, सपकाळवाडी, पिंपरखेडा, सफियाबाद, नाचनवेल, कोपरवेल, जवखेडा खुर्द, शेवता, निपाणी, गव्हाली, ताडपिंपळगावअंतर्गत गाडीवस्ती लोहगाव, निमडोंगरी, बनशेंद्रा, सारोळा, देवगाव रंगारी, देवगाव रंगारी ग्रामपंचायतींतर्गत खोतवाडी, माळेगाव ठोकळ, जामडी (ज.), वाकद, चापानेर, डोणगाव, विठ्ठलपूर, कविटखेडा, देवळाणा, जवखेडा बु., सिरजापूर व शिरजापूर तांडा, डोंगरगाव, रेल व रेलतांडा, कनकावतीनगर, गौतमनगर, वडोद, बिबखेडा, जैतापूर, लंगडातांडा, भांबरवाडी, चांभारवाडी, देवपुडी, हतनूर, आदर्श वसाहत, माटेगाव, बोलटेक, बोलटेक तांडा, रोहिला खुर्द या गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी मंजूर झालेले टँकर येत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मंजूर झालेले टँकर त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टँकर द्या हो, नागरिकांचा टाहो च्कन्नड तालुक्यातील मेहेगाव, बहिरगाव व चिखलठाणअंतर्गत गोपाळवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वीच देऊनही टँकर उपलब्ध झालेले नाहीत, तर शिपघाट, ठाकूरवाडी, हिवरा वाडी, लामणगाव, धारण खेडा, नेवपूरअंतर्गत एकलव्य वस्ती येथील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल आहेत. दिवसेंदिवस टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत आहे. पुढच्या महिन्यात अधिक तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळ