शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पाण्यासोबतच टँकरची टंचाई; कन्नड तालुक्यात मंजुरी मिळूनही ग्रामस्थांच्या नशिबी प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:17 IST

टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

कन्नड (औरंगाबाद ) : उष्णतेचा पारा ४४ अंशांवर पोहोचला असताना कन्नड तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे येथील बहुतांश गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक गावांत पाण्याचे टँकर मंंजूरही झाले आहेत. मात्र, तरीही टँकर येत नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने दखल घेऊन त्वरित टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

कन्नड तालुक्यात वाढणाऱ्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी, विहिरींनी तळ गाठला असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये म्हणून प्रशासनही पाहणी करून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशही देत आहेत. मात्र, टँकर पुरवठादाराकडून टँकर पुरविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत असून पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ नागरिकांसह महिलांवर आली आहे.

तालुक्यातील आठेगाव, शिवराई, दिगाव, शेलगाव, दहिगाव, आडगाव (पि.), मोहरा, आमदाबाद मोहाडी, सासेगाव, बरकतपूर, रायगाव, रुईखेडा, जवळी खुर्द व जवळी बु., कानडगाव (क.), देवळी, गणेशपूर, पिंपरखेडा ग्रामपंचायतींतर्गत पिंपळवाडी, सपकाळवाडी, पिंपरखेडा, सफियाबाद, नाचनवेल, कोपरवेल, जवखेडा खुर्द, शेवता, निपाणी, गव्हाली, ताडपिंपळगावअंतर्गत गाडीवस्ती लोहगाव, निमडोंगरी, बनशेंद्रा, सारोळा, देवगाव रंगारी, देवगाव रंगारी ग्रामपंचायतींतर्गत खोतवाडी, माळेगाव ठोकळ, जामडी (ज.), वाकद, चापानेर, डोणगाव, विठ्ठलपूर, कविटखेडा, देवळाणा, जवखेडा बु., सिरजापूर व शिरजापूर तांडा, डोंगरगाव, रेल व रेलतांडा, कनकावतीनगर, गौतमनगर, वडोद, बिबखेडा, जैतापूर, लंगडातांडा, भांबरवाडी, चांभारवाडी, देवपुडी, हतनूर, आदर्श वसाहत, माटेगाव, बोलटेक, बोलटेक तांडा, रोहिला खुर्द या गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी मंजूर झालेले टँकर येत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मंजूर झालेले टँकर त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टँकर द्या हो, नागरिकांचा टाहो च्कन्नड तालुक्यातील मेहेगाव, बहिरगाव व चिखलठाणअंतर्गत गोपाळवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वीच देऊनही टँकर उपलब्ध झालेले नाहीत, तर शिपघाट, ठाकूरवाडी, हिवरा वाडी, लामणगाव, धारण खेडा, नेवपूरअंतर्गत एकलव्य वस्ती येथील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल आहेत. दिवसेंदिवस टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत आहे. पुढच्या महिन्यात अधिक तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळ