शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

संघाचे लोक देशाला हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत: नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:18 IST

संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही.

औरंगाबाद : नागपूरमध्ये दोन विचार आहेत. एक विचार संघाचा आणि दुसरा दीक्षाभूमीचा. संघाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मला मिळाले. माझा आजही दावा आहे की, संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. मी इतका कडवा बोलतो की, माझ्यापाठीमागे कोण कोण लागतील, असा प्रश्न आहे. अलीकडे ईडी आहे. कारण असे बोलणारे लोक चालत नाही; पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या वारशासोबत जगतो, असे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत म्हणाले.

‘पीईएस’च्या नागसेनवनातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात डाॅ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू के. व्ही. काळे हे अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अभिजित वाडेकर, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. डी. राठोड, मिलिंद मल्टी पर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. वाय. टिळक, मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, मिलिंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री घोबले, प्रकाश मुगदिया, नामदेव पवार यांची उपस्थिती होती.

लोडशेडिंगच्या संकटात येथून ऊर्जा घेऊन जाणारडाॅ. राऊत म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले ऊर्जामंत्री आणि मी राज्याचा ऊर्जामंत्री. राज्यात सध्या लोडशेडिंगचे संकट आहे. अशा वेळी येथून ऊर्जा घेऊन जाण्याचे काम मी करणार आहे.

भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीचे दर्शन घ्यावेकाही लोक भाेंगे बंद करा म्हणत आहेत. मी शिर्डीत जाऊन आलो. तेथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक येतात. भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीत जाऊन दर्शन घ्यावे, असा टोलाही डाॅ. राऊत यांनी लगावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Rautनितीन राऊतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ