शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

संघाचे लोक देशाला हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत: नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:18 IST

संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही.

औरंगाबाद : नागपूरमध्ये दोन विचार आहेत. एक विचार संघाचा आणि दुसरा दीक्षाभूमीचा. संघाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मला मिळाले. माझा आजही दावा आहे की, संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. मी इतका कडवा बोलतो की, माझ्यापाठीमागे कोण कोण लागतील, असा प्रश्न आहे. अलीकडे ईडी आहे. कारण असे बोलणारे लोक चालत नाही; पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या वारशासोबत जगतो, असे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत म्हणाले.

‘पीईएस’च्या नागसेनवनातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात डाॅ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू के. व्ही. काळे हे अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अभिजित वाडेकर, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. डी. राठोड, मिलिंद मल्टी पर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. वाय. टिळक, मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, मिलिंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री घोबले, प्रकाश मुगदिया, नामदेव पवार यांची उपस्थिती होती.

लोडशेडिंगच्या संकटात येथून ऊर्जा घेऊन जाणारडाॅ. राऊत म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले ऊर्जामंत्री आणि मी राज्याचा ऊर्जामंत्री. राज्यात सध्या लोडशेडिंगचे संकट आहे. अशा वेळी येथून ऊर्जा घेऊन जाण्याचे काम मी करणार आहे.

भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीचे दर्शन घ्यावेकाही लोक भाेंगे बंद करा म्हणत आहेत. मी शिर्डीत जाऊन आलो. तेथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक येतात. भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीत जाऊन दर्शन घ्यावे, असा टोलाही डाॅ. राऊत यांनी लगावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Rautनितीन राऊतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ