शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संघाचे लोक देशाला हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत: नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:18 IST

संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही.

औरंगाबाद : नागपूरमध्ये दोन विचार आहेत. एक विचार संघाचा आणि दुसरा दीक्षाभूमीचा. संघाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मला मिळाले. माझा आजही दावा आहे की, संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. मी इतका कडवा बोलतो की, माझ्यापाठीमागे कोण कोण लागतील, असा प्रश्न आहे. अलीकडे ईडी आहे. कारण असे बोलणारे लोक चालत नाही; पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या वारशासोबत जगतो, असे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत म्हणाले.

‘पीईएस’च्या नागसेनवनातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात डाॅ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू के. व्ही. काळे हे अध्यक्षस्थानी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अभिजित वाडेकर, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. डी. राठोड, मिलिंद मल्टी पर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. वाय. टिळक, मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, मिलिंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री घोबले, प्रकाश मुगदिया, नामदेव पवार यांची उपस्थिती होती.

लोडशेडिंगच्या संकटात येथून ऊर्जा घेऊन जाणारडाॅ. राऊत म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले ऊर्जामंत्री आणि मी राज्याचा ऊर्जामंत्री. राज्यात सध्या लोडशेडिंगचे संकट आहे. अशा वेळी येथून ऊर्जा घेऊन जाण्याचे काम मी करणार आहे.

भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीचे दर्शन घ्यावेकाही लोक भाेंगे बंद करा म्हणत आहेत. मी शिर्डीत जाऊन आलो. तेथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक येतात. भोंगे बंद करा म्हणणाऱ्यांनी शिर्डीत जाऊन दर्शन घ्यावे, असा टोलाही डाॅ. राऊत यांनी लगावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Rautनितीन राऊतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ