शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, महापालिका, जीटीएलच्या चक्रव्यूहात जनता

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने एलबीटीची वसुली करण्याचे आदेश जीटीएल कंपनीला दिले आहेत.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने एलबीटीची वसुली करण्याचे आदेश जीटीएल कंपनीला दिले आहेत. तो कर वसूल करून महापालिकेला अदा करावा, असे ते आदेश आहेत. या तिन्ही संस्थांच्या चक्रव्यूहात शहरातील सव्वादोन लाख वीजग्राहक अडकले आहेत. त्यांच्याकडून दरमहा ७० ते ७५ लाख रुपये एलबीटी संकलित करून तो मनपाला जमा करून देण्याची जबाबदारी महावितरणने जीटीएलवर टाकली आहे, तर मनपाला एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ या काळातील अंदाजे २० कोटींचा एलबीटी हवा आहे.
महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. अशातच दरमहा येणाऱ्या वीज बिलात २ टक्के एलबीटी वाढवून येईल. १ हजार रुपयांची वीज वापरली, तर त्यावर २० रुपये एलबीटी लागणार आहे. मनपातील ९९ वॉर्डांतूनच ही वसुली होणार आहे.
एलबीटीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महावितरण कंपनीने १६ आॅक्टोबर २०१४ रोजी एलबीटी वसूल करून मनपाला देण्याचे अथवा मनपाच्या वीज बिलातून कपात करून घेण्याचे आदेश कशासाठी काढले, असा प्रश्न आहे. जीटीएल आणि महावितरण कंपनीत एप्रिल २०११ मध्ये झालेल्या करारानुसार जीटीएलला कोणताही कर अथवा वीज दरवाढीचे अधिकार नाहीत. एमईआरसीच्या सुनावणीनंतर वीज दरवाढ केली जाते, तर कर वसुली ही महावितरणच्या आदेशानुसार एकूण वीज वापरावर लावण्यात येते. एलबीटी वसूल करण्याचा निर्णय महावितरणच्या कक्षेत घेण्यात आला आहे. मनपानेदेखील थकीत एलबीटीसाठी मागील काही महिन्यांत पत्रव्यवहार केलेला नाही. मग अचानक औरंगाबादकरांकडून २० कोटी वसूल करण्याची गरज काय, असा प्रश्न पुढे येतो आहे.