शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांचा घसा कोरडाच; महापौरांच्या इशाऱ्यानंतरही पाणीपुरवठा जशास तसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:47 IST

पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही.

ठळक मुद्दे महानगरपालिका प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत.

औरंगाबाद : शहरात सर्वत्र समान पाणी वाटप झाले पाहिजे असा निर्वाणीचा इशारा ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिला होता. ११ दिवस उलटले तरी शहरात कुठेच समान पाणीवाटप झाले नाही. आजही शहरातील काही वॉर्डांना चौथ्या दिवशी, तर काहींना सहाव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. उन्हाळा संपायला आता फक्त पंधरा दिवस शिल्लक आहेत. मागील तीन महिन्यांत मनपा पदाधिकारी, प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस पाडण्यात आला. अंमलबजावणी शून्य आहे.

जायकवाडी धरणातून आजही दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची तहान बघितल्यास एवढे पाणी पुरेसे आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचे अजिबात नियोजन नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यात प्रचंड ओरड पाहायला मिळत आहे. एका वॉर्डातील नागरिकांना चौथ्या दिवशी चार ते पाच तास पाणी देण्यात येते. दुसऱ्या वॉर्डात सहाव्या, आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. हा दुजाभाव दूर करून समान पाणीवाटप करा, अशी मागणी दरवर्षी उन्हाळ्यात होते. महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नगरसेवक नागरिकांसह आंदोलन करतात.

या आंदोलनांचीही दखल आजपर्यंत प्रशासनाने घेतली  नाही. ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने पाणीपुरवठ्याची बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आज ११ दिवस उलटले तरी पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही. महापौरांनी दिलेल्या आदेशाचे किती पालन महापालिकेत होते हे यावरून दिसून येते. महापौरानंतर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी १० मे रोजी आयुक्तांसोबत पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या बैठकीतही समान पाणीवाटपासाठी आठ दिवसांचा अवधी प्रशासनाला देण्यात आला. १८ मे रोजी हा अवधी संपला. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांना आजही आठव्या, दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्यात आमूलाग्र सुधारणा करीत आहोत हे दाखविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात केल्या. त्यांनी टँकरवर देखरेख ठेवावी असे सांगण्यात आले. त्यानंतरही टँकर वाटपात सुधारणा झालेली नाही. 

मुख्य वाहिनीवरील कनेक्शनशहरातील मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन काढावेत असे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत. मुख्य वाहिनीवर नळ असलेल्या नागरिकांना १३ तास पाणी मिळते. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यासाठी वॉर्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहेत. किती नागरिकांना या पथकांनी दंड आकारला याची आकडेवारीही प्रशासनाकडे नाही. 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नाहीमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही. लाईनमन मनात येईल त्याप्रमाणे पाणीपुरवठा करीत आहेत. एखाद्या वॉर्डाला तब्बल ११ तास, तर दुसऱ्या वॉर्डाला अवघे ४५ मिनिटे पाणी देण्यात येते. हा असतोल दूर करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीagitationआंदोलनMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद