शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शहरवासीयांचा घसा कोरडाच; महापौरांच्या इशाऱ्यानंतरही पाणीपुरवठा जशास तसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:47 IST

पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही.

ठळक मुद्दे महानगरपालिका प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत.

औरंगाबाद : शहरात सर्वत्र समान पाणी वाटप झाले पाहिजे असा निर्वाणीचा इशारा ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिला होता. ११ दिवस उलटले तरी शहरात कुठेच समान पाणीवाटप झाले नाही. आजही शहरातील काही वॉर्डांना चौथ्या दिवशी, तर काहींना सहाव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. उन्हाळा संपायला आता फक्त पंधरा दिवस शिल्लक आहेत. मागील तीन महिन्यांत मनपा पदाधिकारी, प्रशासनाकडून घोषणांचा निव्वळ पाऊस पाडण्यात आला. अंमलबजावणी शून्य आहे.

जायकवाडी धरणातून आजही दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची तहान बघितल्यास एवढे पाणी पुरेसे आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचे अजिबात नियोजन नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यात प्रचंड ओरड पाहायला मिळत आहे. एका वॉर्डातील नागरिकांना चौथ्या दिवशी चार ते पाच तास पाणी देण्यात येते. दुसऱ्या वॉर्डात सहाव्या, आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. हा दुजाभाव दूर करून समान पाणीवाटप करा, अशी मागणी दरवर्षी उन्हाळ्यात होते. महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नगरसेवक नागरिकांसह आंदोलन करतात.

या आंदोलनांचीही दखल आजपर्यंत प्रशासनाने घेतली  नाही. ८ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने पाणीपुरवठ्याची बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आज ११ दिवस उलटले तरी पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही. महापौरांनी दिलेल्या आदेशाचे किती पालन महापालिकेत होते हे यावरून दिसून येते. महापौरानंतर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी १० मे रोजी आयुक्तांसोबत पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या बैठकीतही समान पाणीवाटपासाठी आठ दिवसांचा अवधी प्रशासनाला देण्यात आला. १८ मे रोजी हा अवधी संपला. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांना आजही आठव्या, दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्यात आमूलाग्र सुधारणा करीत आहोत हे दाखविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात केल्या. त्यांनी टँकरवर देखरेख ठेवावी असे सांगण्यात आले. त्यानंतरही टँकर वाटपात सुधारणा झालेली नाही. 

मुख्य वाहिनीवरील कनेक्शनशहरातील मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन काढावेत असे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. प्रशासनाने एकाही लाईनवरील कनेक्शन कापले नाहीत. मुख्य वाहिनीवर नळ असलेल्या नागरिकांना १३ तास पाणी मिळते. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यासाठी वॉर्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहेत. किती नागरिकांना या पथकांनी दंड आकारला याची आकडेवारीही प्रशासनाकडे नाही. 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नाहीमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणत्या वॉर्डाला किती वेळ पाणी द्यायचे, याचे साधे वेळापत्रकही नाही. लाईनमन मनात येईल त्याप्रमाणे पाणीपुरवठा करीत आहेत. एखाद्या वॉर्डाला तब्बल ११ तास, तर दुसऱ्या वॉर्डाला अवघे ४५ मिनिटे पाणी देण्यात येते. हा असतोल दूर करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीagitationआंदोलनMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद