शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात जाळपोळीनंतर शांतता; १६ पोलिस जखमी, ४०० ते ५०० जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 06:27 IST

या घटनेचा भाविकांच्या  उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.   

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील राम मंदिरालगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर शहरात गुरुवारी दिवसभर सर्वत्र शांतता होती. समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळीत पोलिस दलाची १५ आणि खासगी ३ वाहने खाक झाली.  जमावाने केलेल्या दगडफेकीत १६ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा भाविकांच्या  उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.   

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार काही तरुण बुधवारी रात्री कमान उभारत होते. तेव्हा एका दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. तेथे तैनात पोलिसांनी वाद मिटवला. त्यानंतर काही वेळाने दोन्ही बाजूंकडून घोषणा व दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांच्या गाड्यांना टार्गेट केले. 

उजाडण्यापूर्वीच उचलली वाहने 

पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर रस्त्यावर जाळलेली वाहने उजाडण्यापूर्वीच पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटवली. त्याशिवाय रस्त्यावरील दगडांचा खच उचलून पाण्याने रस्ता धुतला. त्यामुळे सकाळी मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांना जाळपोळीच्या खाणाखुणाही दिसल्या नाहीत.  

रामनवमी शांततेत

राम मंदिरात गुरुवारी सकाळीच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या घटनेनंतर शहरात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRam Navamiराम नवमीPoliceपोलिस